शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली, काळजावर दगड ठेवून बाळाची पाठवणी ( डमी 938)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी ...

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी वाटणारंच! जसा त्याला शाळेत जाताना डबा आणि पाण्याची बाटली देतो. तसेच आता मास्क आणि सॅनिटायझर पण दप्तरात ठेवावे लागते. रोज शाळेत जाताना काय कर, काय करू नको, याच्या सूचना देते. मूल थोडे वैतागते, पण काय करणार आईचं मन आहे. तो शाळेतून घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो, ही एका आईची हृदयस्पर्शी भावना. आज हीच अवस्था मुलाला शाळेत पाठविणा-या प्रत्येक माऊलीची झाली आहे. तब्बल दीड वर्षानी शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली आहे. मुलांमध्ये उत्साह, मित्रमैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता, मस्ती अशी सुखद भावना असली तरी आयांची काळजी मात्र वाढलेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजूनही राज्यातील बहुतांश शाळा बंद आहेत. काही पालकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आयांच्या चिंतेत भर पडली आहे. आॅनलाईन शिक्षणाला मुले कंटाळली आहेत. या शिक्षणामुळे एका जागी तासन् तास बसून राहणे, वाढती स्थूलता, चिडचिड तसेच विषयांचे आकलन न होणे, क्लास सुरू असताना मुलांचे गेम खेळणे या सर्व गोष्टी घडत असल्याचे दिसून आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाल्यांच्या आयांकडून सांगण्यात आले आहे. मुलांना शाळेत पाठविण्यामुळे ते खूप खूष झाले आहेत. मात्र सातत्याने कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने थोडी भीतीदेखील आहेच. पण, असे किती दिवस मुलांना घरात बसवून ठेवणार? मुलांना घरात कोंडून ठेवल्यासारखे वाटत असल्याने थोडी रिस्क पत्करून आम्ही मुलांना शाळेत पाठवित आहोत, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद केल्या होत्या, त्यामुळे मुलांना घरूनच आॅनलाईन अभ्यास करावा लागत होता. परंतु सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आॅनलाईन अभ्यासाला मुले कंटाळून गेली होती. सतत मोबाईल बघून डोळ्यांना त्रास होत होता. माझा मुलगा वेदांत हा इयत्ता आठवीत जात असताना त्याला मास्क,सॅनिटाझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्यात सांगण्यात येत आहे. घरी आल्यावर मुलांना स्वच्छ हातपाय धुवूनच घरात घेतो.

- सुरेखा कचर कडूसकर, कोरेगाव खुर्द, ता. खेड

----------------------------

चौकट

पुणे जिल्ह्यात एकूण शाळांची संख्या : 982

पालकांनी संमती दिलेल्या शाळांची संख्या : 233

सुरू झालेल्या माध्यमिक शाळा : 103

इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : 2 लाख 37 हजार 917

---------------------------------------------------------------------------------

मुलांनी शाळेत आणि शाळेतून आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

* शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.

* शाळेच्या सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

* फिजिकल डिस्टंसिंग पाळावे आणि मास्क वापरावा.

* शाळेतून घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत

* मुलांनी स्वच्छ अंघोळ करावी.

* मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळेत पाठवू नये.

-------------------------------