शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली, काळजावर दगड ठेवून बाळाची पाठवणी ( डमी 938)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी ...

पुणे : ‘‘कोरोना अजूनही संपलेला नाही, या स्थितीत लेकरू दीड वर्षांनी शाळेत जातंय... आईचं काळीज आहे. थोडी काळजी वाटणारंच! जसा त्याला शाळेत जाताना डबा आणि पाण्याची बाटली देतो. तसेच आता मास्क आणि सॅनिटायझर पण दप्तरात ठेवावे लागते. रोज शाळेत जाताना काय कर, काय करू नको, याच्या सूचना देते. मूल थोडे वैतागते, पण काय करणार आईचं मन आहे. तो शाळेतून घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो, ही एका आईची हृदयस्पर्शी भावना. आज हीच अवस्था मुलाला शाळेत पाठविणा-या प्रत्येक माऊलीची झाली आहे. तब्बल दीड वर्षानी शाळेची ‘तिसरी घंटा’ वाजली आहे. मुलांमध्ये उत्साह, मित्रमैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता, मस्ती अशी सुखद भावना असली तरी आयांची काळजी मात्र वाढलेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजूनही राज्यातील बहुतांश शाळा बंद आहेत. काही पालकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला असला तरी ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली आहे, त्या मुलांच्या आयांच्या चिंतेत भर पडली आहे. आॅनलाईन शिक्षणाला मुले कंटाळली आहेत. या शिक्षणामुळे एका जागी तासन् तास बसून राहणे, वाढती स्थूलता, चिडचिड तसेच विषयांचे आकलन न होणे, क्लास सुरू असताना मुलांचे गेम खेळणे या सर्व गोष्टी घडत असल्याचे दिसून आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाल्यांच्या आयांकडून सांगण्यात आले आहे. मुलांना शाळेत पाठविण्यामुळे ते खूप खूष झाले आहेत. मात्र सातत्याने कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने थोडी भीतीदेखील आहेच. पण, असे किती दिवस मुलांना घरात बसवून ठेवणार? मुलांना घरात कोंडून ठेवल्यासारखे वाटत असल्याने थोडी रिस्क पत्करून आम्ही मुलांना शाळेत पाठवित आहोत, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------

कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद केल्या होत्या, त्यामुळे मुलांना घरूनच आॅनलाईन अभ्यास करावा लागत होता. परंतु सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. आॅनलाईन अभ्यासाला मुले कंटाळून गेली होती. सतत मोबाईल बघून डोळ्यांना त्रास होत होता. माझा मुलगा वेदांत हा इयत्ता आठवीत जात असताना त्याला मास्क,सॅनिटाझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्यात सांगण्यात येत आहे. घरी आल्यावर मुलांना स्वच्छ हातपाय धुवूनच घरात घेतो.

- सुरेखा कचर कडूसकर, कोरेगाव खुर्द, ता. खेड

----------------------------

चौकट

पुणे जिल्ह्यात एकूण शाळांची संख्या : 982

पालकांनी संमती दिलेल्या शाळांची संख्या : 233

सुरू झालेल्या माध्यमिक शाळा : 103

इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : 2 लाख 37 हजार 917

---------------------------------------------------------------------------------

मुलांनी शाळेत आणि शाळेतून आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

* शाळेत गेल्यानंतर एका बाकावर एकच विद्यार्थ्याने बसावे.

* शाळेच्या सुट्टीत डबा खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

* फिजिकल डिस्टंसिंग पाळावे आणि मास्क वापरावा.

* शाळेतून घरी गेल्यावर मास्क, कपडे गरम पाण्यात धुवावेत

* मुलांनी स्वच्छ अंघोळ करावी.

* मुलाला सर्दी, खोकला असेल तर शाळेत पाठवू नये.

-------------------------------