शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालये आता तरी उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आता निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकानदार जास्त वेळेची मागणी करत आहेत, काही जण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आता निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. दुकानदार जास्त वेळेची मागणी करत आहेत, काही जण दहीहंडीची, काहीजण बैल शर्यतीची, काही जण मंदिर उघडण्याची, तर काही जण रेल्वे प्रवासाची मागणी करत आहेत. पण या सर्वांपेक्षा शिक्षण मंदिरे सुरू होणे गरजेचे आहे. दीड वर्षापासून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करावीत,” अशी मागणी मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडियातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे.

आपले पत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. “ऑनलाईन शिक्षणास खूप मर्यादा आहेत. केवळ २४ टक्के लोकांना चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते. बरीच मुले नावापुरता क्लास सुरू करून गेम खेळत बसतात. या वर्षी परीक्षाही नावापुरत्या घेण्यात आल्या. प्रात्यक्षिक न घेता विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यात आले. या पिढीला आत्मविश्वास न मिळाल्याने समाजाचे व देशाचे मोठे नुकसान होत आहे,” याकडे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू लागले आहे. अजून दोन वर्षे तरी महामारीची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच राहणार आहे. मग किती दिवस शाळा, महावद्यालये बंद ठेवणार, असा प्रश्नही सोसायटीने उपस्थित केला आहे.

चौकट

शिक्षण अशा प्रकारे सुरू करावे :

१. सुरुवातीला केवळ प्रात्यक्षिकांचे तास सुरू करता येतील.

२. केवळ पन्नास टक्के क्षमतेने तास सुरू करता येतील. तीन दिवस पन्नास टक्के मुलांना बोलावून उरलेले तीन दिवस बाकी निम्म्या मुलांना बोलावता येईल.

३. गरज वाटले तर मैदानात तास भरवता येतील.

४. शाळेमध्ये प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक असावे.