शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

विनोदाच्या शाळेचा अस्त...

By admin | Updated: February 8, 2015 01:49 IST

विनोदी नटाला जो भाबडेपणा आवश्यक असतो, तो बापूंच्या ठायी होता. अतिशय इनोसन्ट असे ते व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या घरात राहिलो आहे.

विनोदी नटाला जो भाबडेपणा आवश्यक असतो, तो बापूंच्या ठायी होता. अतिशय इनोसन्ट असे ते व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या घरात राहिलो आहे. त्यांचे व माझे कौटुंबिक असे नाते होते. त्यांच्या विनोदात गोडवा होता. अनेक नटांना चेहऱ्यावर गोडवा आणण्यासाठी मेहनत करावी लागते; मात्र बापूंच्या चेहऱ्यात हा गोडवा मुळापासूनच होता. ते त्याचे वरदान घेऊनच आले होते. त्यांच्यात एक मूल दडलेले होते. त्यांच्यात एक प्रकारचा निरागसपणा होता. मी त्यांच्यासोबत नाटकात कामेही केली आहेत. ‘चोरावर मोर’, ‘काका किशाचा’ अशी नाटके त्यांच्याबरोबर करण्यात एक प्रकारचा आनंद होता. देवनारला त्यांचा एक बंगला होता आणि नाटकाच्या तालमी वगैरे इतर कुठल्या हॉलमध्ये नव्हे; तर त्यांच्या बंगल्यात व्हायच्या. कलाकार तर त्यांच्या घरीच राहायला असायचे आणि अगदी घरगुती स्वरूपात तिथे आमच्या तालमी व्हायच्या. त्यांच्याकडे कलाकारांची बडदास्त उत्तम राखली जात असे. बापू अतिशय कुटुंबवत्सल होते. हसवण्याची किमया त्यांना उपजतच होती. विनोदासाठी लागणारा भाबडेपणा त्यांच्या अंगात आणि अभिनयात सामावला होता. बापूंनी विविध माहितीपटांतही अप्रतिम कामे केली आहेत. ‘जीवन विमा’ची त्यांची जाहिरात आजही विसरता येत नाही. मीसुद्धा त्यांच्यासोबत माहितीपट आणि जाहिरातींत कामे केली आहेत. जे म्हणायचे आहे, तो आशय त्यांच्या डोळ्यांतून सार्थ व्यक्त व्हायचा. बापू म्हणजे विनोदाची शाळाच होती. या शाळेचा आता अस्त झाला आहे. - विजय गोखले, अभिनेता-दिग्दर्शक बापूंविषयी आम्हाला प्रचंड आदर होता. विनोदी नाटकांसाठी त्यांनी जे काही केलंय त्याला तोडच नाही. त्यांचे निधन ही अतिशय दु:खदायक घटना आहे. - आशालता वाबगावकर, ज्येष्ठ अभिनेत्रीत्यांचा व माझा परिचय गेल्या पन्नास वर्षांचा होता. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकात आम्ही प्रथम काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लाल बंगली’ या नाटकातही मी काम केले होते. ते आमच्या घराच्या जवळ राहत असल्याने आमची नेहमी भेट होत असे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे, कारण त्यांच्यासारखा हरहुन्नरी कलावंत माझ्या पाहण्यात फार दुर्मीळ आहे. - जयंत सावरकर, ज्येष्ठ अभिनेतेबापूंच्या जाण्याने फार्सचा बाप गेला अशी भावना माझ्या मनात आहे. रंगभूमीवर जेव्हा स्थैर्य नव्हते; तेव्हा नोकरी सांभाळून त्यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारची आणि लोकांना हसवणारी नाटके दिली. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. तो अतिशय ग्रेट माणूस होता. - प्रमोद पवार, अभिनेतानाटकांमध्ये जो वेगळा प्रवाह आला त्यात आत्माराम भेंडे यांचे मोठे श्रेय आहे. मग दुसऱ्या भाषेतली नाटके मराठीत आणणे असू दे किंवा फार्सला वेगळा आयाम मिळवून देणे असो; भारतीय विद्या भवनच्या स्पर्धा सुरू करणे असो, आयएनटी असो, त्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. - चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक