शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ, मुलांना पडला लेखणीचा विसर; हस्ताक्षर बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

शैक्षणिक जीवनात सुंदर आणि मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला खूप महत्त्व असते. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे असा शिक्षक आणि ...

शैक्षणिक जीवनात सुंदर आणि मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला खूप महत्त्व असते. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे असा शिक्षक आणि पालकांचा याकडे कटाक्ष असतो. त्यासाठी लहानपणापासून सराव केला जातो. वळणदार अक्षर लिहिण्यासाठी दहावी बारावीसाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र मागील एक वर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागला आहे. यामुळे मुलांचे लिहिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांच्या बोटांना लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या उत्तरपत्रिका सोडवणे मुश्कील होणार आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा...

दररोज मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या भाषेतील एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने लेखन गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न उत्तरे सोडवावी म्हणजे गती वाढेल.

एकदम लिखाण न करता काही दिवस ठराविक आणि मोजकेच लिखाण करावे. परंतु लिखाणात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

पालकांनी आपल्या पाल्याच्या लेखनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी त्यांना मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीही वाढेल. मराठी भाषेचे शिक्षक काय म्हणतात -

वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे बिघडलेले अक्षर आणि लिहिण्याची गती वाढविण्यासाठी नियमितपणे शुद्धलेखनाचा सराव करणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणाने मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालवण्यासाठी लेखन सराव योग्य राहील. - नारायण करपे - शिक्षक.

सुंदर लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाईन शिक्षणाने कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण यातूनही मुलांना लिहिण्याचा सराव राहावा यासाठी रोज अभ्यास दिला जातो. तो केला आहे की हे शिक्षक आणि पालकांनी पाहणे गरजेचे आहे. मुलांकडून पालकांनी रोज एक पान शुद्धलेखन लिहून घेतल्यास मुलांमध्ये लिखाणाची आवड निर्माण होईल. - मनोहर मोहरे - शिक्षक.

पालकांचे मत - मागील एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण मुलांना देण्यात येत असल्याने लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी पडला आहे. मुले फक्त लेक्चर ऐकत आहेत. यामुळे मुलांचे हस्ताक्षर आणि गती पार बिघडली आहे. - महेश शेवकरी, पालक.

मोबाईलमुळे लेखन थांबले आहे. प्रत्यक्ष शिक्षकांचा दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. लेखन होत नसल्याने हस्ताक्षराची पार वाट लागली आहे. - राम गोरे, पालक.

-