शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

शालेय शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ, मुलांना पडला लेखणीचा विसर; हस्ताक्षर बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

शैक्षणिक जीवनात सुंदर आणि मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला खूप महत्त्व असते. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे असा शिक्षक आणि ...

शैक्षणिक जीवनात सुंदर आणि मोत्यासारख्या वळणदार हस्ताक्षराला खूप महत्त्व असते. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे असा शिक्षक आणि पालकांचा याकडे कटाक्ष असतो. त्यासाठी लहानपणापासून सराव केला जातो. वळणदार अक्षर लिहिण्यासाठी दहावी बारावीसाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र मागील एक वर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागला आहे. यामुळे मुलांचे लिहिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांच्या बोटांना लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या उत्तरपत्रिका सोडवणे मुश्कील होणार आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनो हे करा...

दररोज मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या भाषेतील एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने लेखन गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न उत्तरे सोडवावी म्हणजे गती वाढेल.

एकदम लिखाण न करता काही दिवस ठराविक आणि मोजकेच लिखाण करावे. परंतु लिखाणात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

पालकांनी आपल्या पाल्याच्या लेखनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी त्यांना मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीही वाढेल. मराठी भाषेचे शिक्षक काय म्हणतात -

वार्षिक परीक्षा जवळ आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे बिघडलेले अक्षर आणि लिहिण्याची गती वाढविण्यासाठी नियमितपणे शुद्धलेखनाचा सराव करणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणाने मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालवण्यासाठी लेखन सराव योग्य राहील. - नारायण करपे - शिक्षक.

सुंदर लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाईन शिक्षणाने कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण यातूनही मुलांना लिहिण्याचा सराव राहावा यासाठी रोज अभ्यास दिला जातो. तो केला आहे की हे शिक्षक आणि पालकांनी पाहणे गरजेचे आहे. मुलांकडून पालकांनी रोज एक पान शुद्धलेखन लिहून घेतल्यास मुलांमध्ये लिखाणाची आवड निर्माण होईल. - मनोहर मोहरे - शिक्षक.

पालकांचे मत - मागील एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण मुलांना देण्यात येत असल्याने लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी पडला आहे. मुले फक्त लेक्चर ऐकत आहेत. यामुळे मुलांचे हस्ताक्षर आणि गती पार बिघडली आहे. - महेश शेवकरी, पालक.

मोबाईलमुळे लेखन थांबले आहे. प्रत्यक्ष शिक्षकांचा दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. लेखन होत नसल्याने हस्ताक्षराची पार वाट लागली आहे. - राम गोरे, पालक.

-