शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

‘शिष्यवृत्ती देता का, कोणी शिष्यवृत्ती’

By admin | Updated: May 27, 2017 01:33 IST

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तीन महिने उलटून गेले तरी मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तीन महिने उलटून गेले तरी मिळालेली नाही. शहरातील सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.शहरातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि त्यात खंड पडू नये, यासाठी महापालिकेकडून मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेंतर्गत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार, तर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेंतर्गत बारावीतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी सर्वसाधारण गटासाठी ८० टक्के, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के गुणांची अट आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्तीचा धनादेश हातात पडेपर्यंत दरवर्षी जानेवारी ते फे्रबुवारी महिना उजाडतो. चालू वर्षी मात्र मे महिना जवळपास संपत आला आहे. तसेच आता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतील, असे असताना मागील वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. चालू वर्षी या शिष्यवृत्तीसाठी ११ हजार ९९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात दहावीच्या तब्बल ९ हजार ५४६, तर बारावीच्या २ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या आठवडाभरात विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे धनादेश दिले जातील, असा दावा नागरवस्ती विभागाकडून करण्यात आला आहे.