शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

लाभार्थी सोडून भलत्यालाच शिष्यवृत्ती

By admin | Updated: May 7, 2017 03:00 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लाभार्थीला सोडून भलत्याच व्यक्तीला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चूक झाल्याचे उघड झाल्यानंतर ही रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूलदेखील करण्यात आली. २०१४-१५ या वर्षामधील दहावी, बारावी शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त कामगार व कामगार कुटुंबीय विद्यार्थ्यांचा सत्कार या योजनेंतर्गत गुणवत्ता प्राप्त लाभार्थीला शिष्यवृत्ती प्रदान करीत असताना अभिषेक देशमुख यांना गुणवत्ताधारक म्हणून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. मात्र, नंतर नजरचुकीने ही रक्कम अदा करण्यात आल्याची सबब मंडळाकडून देण्यात आली. तसेच आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांना अदा केलेली शिष्यवृत्तीची रक्कम पुन्हा त्यांच्याकडून वसूलही करण्यात आली. दरम्यान, पात्र लाभार्थी सोडून इतर व्यक्तीला रक्कम अदा करण्यासारखा गंभीर प्रकार घडला असतानाही केवळ नजरचुकीने हा प्रकार घडला असल्याची सबब मंडळाकडून पुढे केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच सन २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून पात्र शिष्यवृत्ती धारकास मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम धनादेशाद्वारे न देता ईसीएसद्वारे देण्यात यावी, असा निर्णय मंडळाने घेतला आहे. तरीदेखील ईसीएसद्वारे शिष्यवृत्ती प्रदान करताना अडचणी निर्माण झाल्याचे कारण देत धनादेशाद्वारेच शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली. सावळ्या गोंधळाची सारवासारवविद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मुंबई कामगार कल्याण कायदा अधिनियमांतर्गत मंडळाला निधी देणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याची मंडळाची योजना आहे. कामगारांच्या मुलामुलींना त्या त्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाकरिता अर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागील हेतू आहे. ढिसाळ कारभाराचा फटकाकामगार कल्याण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा हा नमुना या प्रकरणात पहायला मिळाला. अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कारभाराचा अनेकांना फटका बसत आहे. चुकीच्या पद्धतीने रक्कम अदाचुकीच्या पद्धतीने रक्कम अदा केली जाते, पुन्हा वसूलही केली जाते. मात्र, असे प्रकार घडतातच कसे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.