शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

स्किझोफ्रेनियाग्रस्तांमध्ये होतेय ‘परिवर्तन’- व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत असल्याने स्वत:च्या पायावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:10 IST

नितीन गायकवाड पुणे : स्किझोफ्रेनियाग्रस्तांनाही आता कोणाचाही आधारविना जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. त्यांना मानसिक आजार असल्याने अनेकजण नोकरी देत ...

नितीन गायकवाड

पुणे : स्किझोफ्रेनियाग्रस्तांनाही आता कोणाचाही आधारविना जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. त्यांना मानसिक आजार असल्याने अनेकजण नोकरी देत नाहीत. त्यामुळे ते नैराश्यात जातात. पण आता ‘परिवर्तन’ संस्थेमुळे त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभा राहता येत आहे.

मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ‘परिवर्तन’ या सेवाभावी संस्थेची स्थापना तीन दशकांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. शैला दाभोलकर यांनी केली. संस्थेद्वारे तीव्र मानसिक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींना आधार देऊन व्यवसायाभिमुख कामाचे प्रशिक्षणही दिले जाते. संस्थेने आज अखेर शंभराहून अधिक रुग्णांना बरे करून नोकरी मिळवून दिली आहे आणि त्यांचे पुनर्वसन केले आहे.

तीव्र मानसिक आजारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणा-या रुग्णांसाठी संस्थेचे कोथरूड येथे ‘मनोबल कौशल्य’ केंद्र दररोज सुरू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा एक गंभीर मानसिक आजार असून, जगभरात २१ दशलक्षाहून अधिक लोकांना याचा त्रास होतोय. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्याबद्दलची सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणि त्याबाबतच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

-----------

समाजात अजूनही मानसिक आजारांविषयी खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. परिवर्तनमार्फत मानसिक आरोग्य सुविधा या माफक दरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात. लॉकडाऊनमध्येही संस्थेचे काम थांबलेले नाही. संस्थेने ‘मानसरंग’ व ‘मनोबल’ हे उपक्रम बंद न ठेवता आॅनलाइनद्वारे त्यांची महाराष्ट्रभर व्याप्ती वाढविली आहे. समाजातील दुर्लक्षितांना संस्थेमार्फत पुणे, सातारा व आसाममध्ये सेवा दिल्या जातात.

-----------

कलागुणांना वाव दिल्याने वाढतोय आत्मविश्वास...

मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून त्याविषयी प्रबोधन करणे या उद्देशाने संस्थेमार्फत ‘मानसरंग’ नावाचा उपक्रम चालवला जातो. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे आणि राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून मानसरंगची निर्मिती झाली आहे. तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन नाटक, गाणे, कविता, चित्रकला अशा कला माध्यमांतून तीव्र आजारी व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना बळ देण्याचे काम यात केले जाते. दर शुक्रवारी तीव्र मानसिक आजाराशी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे पालक एकत्र येतात व आठवड्याभराचा आत्मविश्वास घेऊन जातात.

-----------