शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

यवतच्या तृतीयपंथी वाड्यात गौरी गणपतीसमोर साकारला निसर्गसंपदेचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:15 IST

यवत : माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारे देखावा यवत ...

यवत : माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारे देखावा यवत येथील तृतीयपंथी वाड्यात गौरी गणेशासमोर साकारला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध नियमांसह गौरी गणेश उत्सव साजरा केला जात आहे. यवतमधील तृतीयपंथी वाड्यात साजरा होणारा गौरी गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.

यवत (ता. दौंड) येथील तृतीयपंथी वाड्यात दीपा गुरू रंजिता नायक यांनी गौरी गणपती उत्सव सुरू करून त्यामधून सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न संपूर्ण यवत पंचक्रोशीतील गावांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचा येथे वाडा आहे. तृतीयपंथी बदलले तरी येथे येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांच्या प्रमुखाने गावातील सर्व नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. यामुळे इतरत्र सर्वत्र उपेक्षित म्हणून गणले जाणारे तृतीयपंथीय यवतमध्ये मात्र सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत असते.

गौरी गणपती उत्सव सुरू केल्यानंतर त्यांच्या आदरात आणखी भर पडली आहे. त्यांनी गौरी गणपतीला केलेली सजावट पाहण्यासाठी केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील महिला व नागरिक काल मोठ्या प्रमाणावर आले होते. गौरी गणपतीला त्यांनी केवळ आकर्षक सजावट व देखावा न करता सामाजिक संदेश देण्यासाठी सर्वधर्मसमभाव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा यासारखे संदेश त्यांनी मागील काही वर्षांत साकारले आहेत.

दीपा गुरू रंजिता नायक, पल्लवी गुरू दीपा, लखन गुरू दीपा, विकी गुरू दीपा, अचल गुरू दिव्या, हेमा गुरू पल्लवी, दिव्या गुरू पल्लवी, गौरी गुरू पल्लवी, पौर्णिमा गुरू गौरी, राधा गुरू गौरी, रुपाली गुरू अचल, ममता गुरू पौर्णिमा, अर्पिता गुरू सीमा, सीमा गुरू गौरी यांनी यंदा केलेल्या गौरी गणपतीची सजावट निश्चितच स्वतःला समाजात मिरवून घेणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी होती.

चौकट :

मुंबईमधील सेलिब्रिटीसपासून ते नागपूरमधील गडकरी वाड्यात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवाची प्रसिद्धी सर्वच प्रसिद्धी माध्यमांमधून होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तृतीयपंथी वाड्यात साजरा केला जाणार गौरी गणपती उत्सव मात्र अद्यापपर्यंत यापासून उपेक्षित होता. मात्र मागील काही वर्षांत विशेष प्रसिद्ध झाला आहे.