शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

यवतच्या तृतीयपंथी वाड्यात गौरी गणपतीसमोर साकारला निसर्गसंपदेचा देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:15 IST

यवत : माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारे देखावा यवत ...

यवत : माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारे देखावा यवत येथील तृतीयपंथी वाड्यात गौरी गणेशासमोर साकारला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध नियमांसह गौरी गणेश उत्सव साजरा केला जात आहे. यवतमधील तृतीयपंथी वाड्यात साजरा होणारा गौरी गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.

यवत (ता. दौंड) येथील तृतीयपंथी वाड्यात दीपा गुरू रंजिता नायक यांनी गौरी गणपती उत्सव सुरू करून त्यामधून सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न संपूर्ण यवत पंचक्रोशीतील गावांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचा येथे वाडा आहे. तृतीयपंथी बदलले तरी येथे येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांच्या प्रमुखाने गावातील सर्व नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. यामुळे इतरत्र सर्वत्र उपेक्षित म्हणून गणले जाणारे तृतीयपंथीय यवतमध्ये मात्र सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत असते.

गौरी गणपती उत्सव सुरू केल्यानंतर त्यांच्या आदरात आणखी भर पडली आहे. त्यांनी गौरी गणपतीला केलेली सजावट पाहण्यासाठी केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील महिला व नागरिक काल मोठ्या प्रमाणावर आले होते. गौरी गणपतीला त्यांनी केवळ आकर्षक सजावट व देखावा न करता सामाजिक संदेश देण्यासाठी सर्वधर्मसमभाव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा यासारखे संदेश त्यांनी मागील काही वर्षांत साकारले आहेत.

दीपा गुरू रंजिता नायक, पल्लवी गुरू दीपा, लखन गुरू दीपा, विकी गुरू दीपा, अचल गुरू दिव्या, हेमा गुरू पल्लवी, दिव्या गुरू पल्लवी, गौरी गुरू पल्लवी, पौर्णिमा गुरू गौरी, राधा गुरू गौरी, रुपाली गुरू अचल, ममता गुरू पौर्णिमा, अर्पिता गुरू सीमा, सीमा गुरू गौरी यांनी यंदा केलेल्या गौरी गणपतीची सजावट निश्चितच स्वतःला समाजात मिरवून घेणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी होती.

चौकट :

मुंबईमधील सेलिब्रिटीसपासून ते नागपूरमधील गडकरी वाड्यात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवाची प्रसिद्धी सर्वच प्रसिद्धी माध्यमांमधून होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तृतीयपंथी वाड्यात साजरा केला जाणार गौरी गणपती उत्सव मात्र अद्यापपर्यंत यापासून उपेक्षित होता. मात्र मागील काही वर्षांत विशेष प्रसिद्ध झाला आहे.