शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सावित्रीच्या लेकींनी केला वडिलांचा अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. ...

नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. त्यातीलच एक परंपरा म्हणजे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी मुलींनी न करता मुलानेच करायचा. मुलगा नसल्यास पुतण्या किंवा भावकीतील पुरुषाने अंत्यविधी करायचा. या सगळ्या परंपरांना फाटा देत, नीरेच्या बाबर कुटुंबाच्या पाच मुलींनी वडिलांच्या मृत्युपश्चात अंत्यविधी केला.

पुरंदर तालुक्यातील नीरा प्रभाग ३ मध्ये अशोक श्रीरंगराव बाबर (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि. १२) निधन झाले. बाबर यांना पाच मुली आहेत. मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. नीरा येथील बाबर कुटुंबातील सदस्य, पै-पाहुणे व जावई अंत्यविधीसाठी तयार होते, पण आत्याच्या कन्या डॉ.ज्योती प्रवीण यादव व चिरंजीव बापू गायकवाड यांनी मुलींनीच अंत्यविधी करावा, असा विचार पुढे केला. धाकट्या मुलीने अंत्यविधी करण्यास हरकत नसावी, असा विचार पुढे आला. रोहिणी प्रकाश वाघ यांनी मुखाग्नी द्यावा, असे ठरले. घरापुढून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत त्या शिखाळ हतात घेऊन चालत गेल्या. नीरा बाजरपेठेतून अशी अंत्ययात्रा यापूर्वी नीरेच्या प्रभाग २मधील भुजबळ कुटुंबातील लेकींनी १० जुलै, २०१६ साली जाताना पहिली होती. नीरेच्या लेकींनी दुसऱ्यांदा अशा पद्धतीने वडिलांचा अंत्यविधी करताना पाहिले.

बाबर यांना पाच मुली सीमा प्रल्हाद मुळीक (रा. बारामती), सुवर्ण अर्जुन रायते (सणसर ता. इंदापूर), संगीता दत्तात्रय घोगरे (रा.गोपाळवाडी ता. दौंड), सारिका संभाजी मचाले (रा.जिरेगाव बारामती), रोहिणी प्रकाश वाघ (रा.काऱ्हाटी ता. बारामती) यांसह सर्व जावई व नातेवाईक उपस्थित होते.

अशोक बाबर यांच्या पत्नी स्वाती अशोक बाबर यांनी पती आजारी पडल्यावर व आधी मोठे कष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केले. योग्य ठिकाणी विवाह करून दिले. गेली सहा वर्षे अशोक बाबर हे व्याधींनी आजारी होते. सलग पाच वर्षे ते घरीच अंथरुणावर होते. पाचही मुलींनी आळीपाळीने वडिलांची सेवा केली. पाचही मुलींच्या सासरकडचे कधीच त्यांना टोकत नव्हते. परंपरेकडे डोळसपणे पाहावे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांत आजही जुन्या रूढी-परंपरा तशाच आहेत. परंपरा पाळणे हा घटनेने दिलेला अधिकार असला, तरी परंपरेकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, तसेच पुरुषप्रधान संस्कृती महिलाही कुठे मागे नाहीत, हे दाखवून दिले.