शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

सावित्रीच्या लेकींनी केला वडिलांचा अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. ...

नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. त्यातीलच एक परंपरा म्हणजे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी मुलींनी न करता मुलानेच करायचा. मुलगा नसल्यास पुतण्या किंवा भावकीतील पुरुषाने अंत्यविधी करायचा. या सगळ्या परंपरांना फाटा देत, नीरेच्या बाबर कुटुंबाच्या पाच मुलींनी वडिलांच्या मृत्युपश्चात अंत्यविधी केला.

पुरंदर तालुक्यातील नीरा प्रभाग ३ मध्ये अशोक श्रीरंगराव बाबर (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि. १२) निधन झाले. बाबर यांना पाच मुली आहेत. मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. नीरा येथील बाबर कुटुंबातील सदस्य, पै-पाहुणे व जावई अंत्यविधीसाठी तयार होते, पण आत्याच्या कन्या डॉ.ज्योती प्रवीण यादव व चिरंजीव बापू गायकवाड यांनी मुलींनीच अंत्यविधी करावा, असा विचार पुढे केला. धाकट्या मुलीने अंत्यविधी करण्यास हरकत नसावी, असा विचार पुढे आला. रोहिणी प्रकाश वाघ यांनी मुखाग्नी द्यावा, असे ठरले. घरापुढून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत त्या शिखाळ हतात घेऊन चालत गेल्या. नीरा बाजरपेठेतून अशी अंत्ययात्रा यापूर्वी नीरेच्या प्रभाग २मधील भुजबळ कुटुंबातील लेकींनी १० जुलै, २०१६ साली जाताना पहिली होती. नीरेच्या लेकींनी दुसऱ्यांदा अशा पद्धतीने वडिलांचा अंत्यविधी करताना पाहिले.

बाबर यांना पाच मुली सीमा प्रल्हाद मुळीक (रा. बारामती), सुवर्ण अर्जुन रायते (सणसर ता. इंदापूर), संगीता दत्तात्रय घोगरे (रा.गोपाळवाडी ता. दौंड), सारिका संभाजी मचाले (रा.जिरेगाव बारामती), रोहिणी प्रकाश वाघ (रा.काऱ्हाटी ता. बारामती) यांसह सर्व जावई व नातेवाईक उपस्थित होते.

अशोक बाबर यांच्या पत्नी स्वाती अशोक बाबर यांनी पती आजारी पडल्यावर व आधी मोठे कष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केले. योग्य ठिकाणी विवाह करून दिले. गेली सहा वर्षे अशोक बाबर हे व्याधींनी आजारी होते. सलग पाच वर्षे ते घरीच अंथरुणावर होते. पाचही मुलींनी आळीपाळीने वडिलांची सेवा केली. पाचही मुलींच्या सासरकडचे कधीच त्यांना टोकत नव्हते. परंपरेकडे डोळसपणे पाहावे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांत आजही जुन्या रूढी-परंपरा तशाच आहेत. परंपरा पाळणे हा घटनेने दिलेला अधिकार असला, तरी परंपरेकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, तसेच पुरुषप्रधान संस्कृती महिलाही कुठे मागे नाहीत, हे दाखवून दिले.