शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

‘जीवनदायी’ने तारले

By admin | Updated: February 2, 2015 02:33 IST

राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत.

पुणे : राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत. या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आल्याने गरीब रुग्णांना आधार मिळालेला आहे. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त, बालरोग आणि कर्करोग झालेल्या रुग्णांवर करण्यात आले आहेत.ग्ािरबीत जीवन जगणाऱ्यांना एखादा आजार जडला तर त्यावर उपचार करण्यासाठी पैसेही नसतात. अशा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मोफत देण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ही योजना १ नोव्हेंबर २०१३ पासून ससून रुग्णालयात राबविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.याबाबत या योजनेच्या ससूनमधील प्रमुख डॉ. भारती दासवानी म्हणाल्या, ‘‘या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. ससूनमध्ये काही विशिष्ट आजारांमध्ये मोफत उपचार मिळत नव्हते. या जीवनदायी योजनेमुळे आता सर्व आजारांवर मोफत उपचार शक्य झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ४०० रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त-फ्रॅक्चर झालेले, बालरोगी, कर्करुग्णांवर करण्यात आले. ३०० अपघातग्रस्त रुग्णांवर, ३०० बालरोगींवर, ३०० कर्करोगींवर, २०० मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर, २०० कान-नाक-घसा आजाराच्या रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत.’’राज्य शासनाकडून ससूनला आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत, असे सांगताना डॉ. दासवानी म्हणाल्या, ‘‘आजही रेशनकार्ड नसल्याने या योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. ही योजना सुरू केली तेव्हा हे प्रमाण ८० टक्के होते. ते प्रमाण आता ५० टक्क्यांवर आले आहे.