शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘जीवनदायी’ने तारले

By admin | Updated: February 2, 2015 02:33 IST

राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत.

पुणे : राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत. या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आल्याने गरीब रुग्णांना आधार मिळालेला आहे. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त, बालरोग आणि कर्करोग झालेल्या रुग्णांवर करण्यात आले आहेत.ग्ािरबीत जीवन जगणाऱ्यांना एखादा आजार जडला तर त्यावर उपचार करण्यासाठी पैसेही नसतात. अशा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मोफत देण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ही योजना १ नोव्हेंबर २०१३ पासून ससून रुग्णालयात राबविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.याबाबत या योजनेच्या ससूनमधील प्रमुख डॉ. भारती दासवानी म्हणाल्या, ‘‘या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. ससूनमध्ये काही विशिष्ट आजारांमध्ये मोफत उपचार मिळत नव्हते. या जीवनदायी योजनेमुळे आता सर्व आजारांवर मोफत उपचार शक्य झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ४०० रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त-फ्रॅक्चर झालेले, बालरोगी, कर्करुग्णांवर करण्यात आले. ३०० अपघातग्रस्त रुग्णांवर, ३०० बालरोगींवर, ३०० कर्करोगींवर, २०० मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर, २०० कान-नाक-घसा आजाराच्या रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत.’’राज्य शासनाकडून ससूनला आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत, असे सांगताना डॉ. दासवानी म्हणाल्या, ‘‘आजही रेशनकार्ड नसल्याने या योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. ही योजना सुरू केली तेव्हा हे प्रमाण ८० टक्के होते. ते प्रमाण आता ५० टक्क्यांवर आले आहे.