शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘जीवनदायी’ने तारले

By admin | Updated: February 2, 2015 02:33 IST

राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत.

पुणे : राज्य शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना ससून रुग्णालयात सुरू करण्यात आल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २ हजार ४०० जणांचे प्राण वाचले आहेत. या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आल्याने गरीब रुग्णांना आधार मिळालेला आहे. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त, बालरोग आणि कर्करोग झालेल्या रुग्णांवर करण्यात आले आहेत.ग्ािरबीत जीवन जगणाऱ्यांना एखादा आजार जडला तर त्यावर उपचार करण्यासाठी पैसेही नसतात. अशा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मोफत देण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. ही योजना १ नोव्हेंबर २०१३ पासून ससून रुग्णालयात राबविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.याबाबत या योजनेच्या ससूनमधील प्रमुख डॉ. भारती दासवानी म्हणाल्या, ‘‘या योजनेअंतर्गत गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. ससूनमध्ये काही विशिष्ट आजारांमध्ये मोफत उपचार मिळत नव्हते. या जीवनदायी योजनेमुळे आता सर्व आजारांवर मोफत उपचार शक्य झाले आहेत. गेल्या १४ महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ४०० रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उपचार हे अपघातग्रस्त-फ्रॅक्चर झालेले, बालरोगी, कर्करुग्णांवर करण्यात आले. ३०० अपघातग्रस्त रुग्णांवर, ३०० बालरोगींवर, ३०० कर्करोगींवर, २०० मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर, २०० कान-नाक-घसा आजाराच्या रुग्णांवर या योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले आहेत.’’राज्य शासनाकडून ससूनला आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत, असे सांगताना डॉ. दासवानी म्हणाल्या, ‘‘आजही रेशनकार्ड नसल्याने या योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. ही योजना सुरू केली तेव्हा हे प्रमाण ८० टक्के होते. ते प्रमाण आता ५० टक्क्यांवर आले आहे.