शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोना महामारीतून महाराष्ट्राची सुटका कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

आळंदी : आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. शेकडो वर्षे पंढरीच्या वारीत लाखो वारकरी व नागरिक ...

आळंदी : आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. शेकडो वर्षे पंढरीच्या वारीत लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र, कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. शुक्रवारी संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. यानिमित्त विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी, अशी प्रार्थना माऊलीचरणी केली.

या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळाप्रमुख विकास ढगे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला, अविनाश तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, विजया शिंदे, मंगल सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलीस निरीक्षक मोहन यादव, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते आहे. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात. मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव वाढला होता त्या वेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोधक काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि टीकेला महत्त्व देत नाही. दरम्यान, यावेळी अन्नदानासाठी गोऱ्हे यांनी देणगी दिली.

०२ आळंदी गोऱ्हे

माऊलींच्या संजीवन समाधीस प्रणाम करताना नीलम गोऱ्हे.

Attachments area.