शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना महामारीतून महाराष्ट्राची सुटका कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

आळंदी : आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. शेकडो वर्षे पंढरीच्या वारीत लाखो वारकरी व नागरिक ...

आळंदी : आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. शेकडो वर्षे पंढरीच्या वारीत लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र, कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. शुक्रवारी संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. यानिमित्त विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी, अशी प्रार्थना माऊलीचरणी केली.

या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळाप्रमुख विकास ढगे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला, अविनाश तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, विजया शिंदे, मंगल सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलीस निरीक्षक मोहन यादव, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते आहे. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात. मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव वाढला होता त्या वेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोधक काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि टीकेला महत्त्व देत नाही. दरम्यान, यावेळी अन्नदानासाठी गोऱ्हे यांनी देणगी दिली.

०२ आळंदी गोऱ्हे

माऊलींच्या संजीवन समाधीस प्रणाम करताना नीलम गोऱ्हे.

Attachments area.