शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नीरा खोऱ्यातील धरणातील पाणीसाठा समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिंचे : यंदा नीरा नदीच्या खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणी साठा समाधान कारक आहे. वीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परिंचे : यंदा नीरा नदीच्या खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणी साठा समाधान कारक आहे. वीर (ता. पुरंदर) धरणातून खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात आवर्तन सलग सुरू ठेवण्यात आले असल्याने पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जून महिन्यापर्यंत हे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.

रविवारी (दि.१६) घेतलेल्या आकडेवारी नुसार वीर धरणात ५६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वीर धरणांमध्ये ५.७ टिएमसी पाणी साठा म्हणजे ५६ टक्के पाणी साठा आहे. जुन्या कालव्यातून १ हजार ५५० क्युसेक व डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भाटघर धरणात ५.५ टीएमसी म्हणजे २२.४४ टक्के पाणी साठा आहे. गुंजवणी धरणात १.७५ टीएमसी म्हणजे ४७.३४ टक्के पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणात २.६ टीएमसी म्हणजे २१ टक्के पाणीसाठा आहे. चालू वर्षी धरणात पाणीसाठा समाधानकारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू राहिला होता.

पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याची परिस्थिती यंदा समाधानकारक असल्याचे पहायला मिळते. पाऊस जास्त झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे रब्बी हंगामाचे आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते. चालू वर्षी धरणात पाणी साठा समाधान कारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू रहाण्यासाठी मदत होणार आहे. नीरा-देवघर धरणातून ७२० क्युसेक, भाडघर धरणातून १९५६ क्युसेक व गुंजवणी धरणातून १०० क्युसेक पाणी वीर धरणात येत असून एकूण आवक २७७६ क्युसेक इतकी आहे. वीर धरणातून २३७७ क्युसेक जावक आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. यावेळी संभाजी शेडगे, विजय वाल्मिक आदी अधिकारी उपस्थित होते. फोटो ओळ- वीर (ता. पुरंदर) धरणात ५६ टक्के पाणीसाठा असून सलग उन्हाळी आवर्तन चालू ठेवण्यात आले आहे.