शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

नीरा खोऱ्यातील धरणातील पाणीसाठा समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परिंचे : यंदा नीरा नदीच्या खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणी साठा समाधान कारक आहे. वीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परिंचे : यंदा नीरा नदीच्या खोऱ्यातील धरण साखळी क्षेत्रात पाणी साठा समाधान कारक आहे. वीर (ता. पुरंदर) धरणातून खरीप हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात आवर्तन सलग सुरू ठेवण्यात आले असल्याने पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जून महिन्यापर्यंत हे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सहायक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.

रविवारी (दि.१६) घेतलेल्या आकडेवारी नुसार वीर धरणात ५६ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वीर धरणांमध्ये ५.७ टिएमसी पाणी साठा म्हणजे ५६ टक्के पाणी साठा आहे. जुन्या कालव्यातून १ हजार ५५० क्युसेक व डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. भाटघर धरणात ५.५ टीएमसी म्हणजे २२.४४ टक्के पाणी साठा आहे. गुंजवणी धरणात १.७५ टीएमसी म्हणजे ४७.३४ टक्के पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणात २.६ टीएमसी म्हणजे २१ टक्के पाणीसाठा आहे. चालू वर्षी धरणात पाणीसाठा समाधानकारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू राहिला होता.

पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याची परिस्थिती यंदा समाधानकारक असल्याचे पहायला मिळते. पाऊस जास्त झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे रब्बी हंगामाचे आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते. चालू वर्षी धरणात पाणी साठा समाधान कारक राहिल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत चालू रहाण्यासाठी मदत होणार आहे. नीरा-देवघर धरणातून ७२० क्युसेक, भाडघर धरणातून १९५६ क्युसेक व गुंजवणी धरणातून १०० क्युसेक पाणी वीर धरणात येत असून एकूण आवक २७७६ क्युसेक इतकी आहे. वीर धरणातून २३७७ क्युसेक जावक आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. यावेळी संभाजी शेडगे, विजय वाल्मिक आदी अधिकारी उपस्थित होते. फोटो ओळ- वीर (ता. पुरंदर) धरणात ५६ टक्के पाणीसाठा असून सलग उन्हाळी आवर्तन चालू ठेवण्यात आले आहे.