शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

By admin | Updated: May 31, 2017 01:55 IST

शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील योजनेची चारी उघडी पडली आहे. त्यामुळे १५ एचपीच्या दोन मोटार जुन्या धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी घेतले जात आहे. यामुळे पाणी कमी प्रमाणात उचलण्यात येत असल्याने सासवडला १ जूनपासून दोन दिवसांआड मात्र चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली. सासवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्ष भोंडे यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक दिनेश भिंताडे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या ठिकाणी ४०० एमसीएफटीएवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सासवडला दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या वीरमधून ४० लाख आणि घोरपडी पाझर तलावातून १० लाख लिटर पाणी घेण्यात येत आहे. गराडे पाझर तलावातील पाणी यापूर्वीच संपले आहे. गतवर्षी या दिवसांत वीरमध्ये पुरेसा पाणीसाठा होता, तसेच सासवडच्या योजनेची चारी उघडी पडली नव्हती, त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय वढणे यांनी दिली. त्यातही सध्या वादळी वारे किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. २००३-०४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ३५ किमी लांबीची, सुमारे २० कोटी रुपये खर्चाची ही योजना केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली आहे. वीर योजनेची जॅकवेल ही १५ फूट रुंद असून तिची उंची २५ फूट आहे. त्या वेळी असणाऱ्या पंपामधून आजही पाणीउपसा केला जात आहे, या पंपांची पाणीउपसा करण्याची क्षमता आता कमी झाली आहे. त्यामुळे हे पंप पुढील काळात बदलण्यात येणार असून या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून पंप चालविले जाणार आहेत. सध्या वीर योजनेवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्ष भोंडे व उपनगरध्यक्ष वढणे यांनी केले आहे.