शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

By admin | Updated: May 31, 2017 01:55 IST

शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील योजनेची चारी उघडी पडली आहे. त्यामुळे १५ एचपीच्या दोन मोटार जुन्या धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी घेतले जात आहे. यामुळे पाणी कमी प्रमाणात उचलण्यात येत असल्याने सासवडला १ जूनपासून दोन दिवसांआड मात्र चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली. सासवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्ष भोंडे यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक दिनेश भिंताडे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या ठिकाणी ४०० एमसीएफटीएवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सासवडला दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या वीरमधून ४० लाख आणि घोरपडी पाझर तलावातून १० लाख लिटर पाणी घेण्यात येत आहे. गराडे पाझर तलावातील पाणी यापूर्वीच संपले आहे. गतवर्षी या दिवसांत वीरमध्ये पुरेसा पाणीसाठा होता, तसेच सासवडच्या योजनेची चारी उघडी पडली नव्हती, त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय वढणे यांनी दिली. त्यातही सध्या वादळी वारे किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. २००३-०४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ३५ किमी लांबीची, सुमारे २० कोटी रुपये खर्चाची ही योजना केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली आहे. वीर योजनेची जॅकवेल ही १५ फूट रुंद असून तिची उंची २५ फूट आहे. त्या वेळी असणाऱ्या पंपामधून आजही पाणीउपसा केला जात आहे, या पंपांची पाणीउपसा करण्याची क्षमता आता कमी झाली आहे. त्यामुळे हे पंप पुढील काळात बदलण्यात येणार असून या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून पंप चालविले जाणार आहेत. सध्या वीर योजनेवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्ष भोंडे व उपनगरध्यक्ष वढणे यांनी केले आहे.