शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

By admin | Updated: May 31, 2017 01:55 IST

शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील योजनेची चारी उघडी पडली आहे. त्यामुळे १५ एचपीच्या दोन मोटार जुन्या धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी घेतले जात आहे. यामुळे पाणी कमी प्रमाणात उचलण्यात येत असल्याने सासवडला १ जूनपासून दोन दिवसांआड मात्र चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली. सासवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्ष भोंडे यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक दिनेश भिंताडे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या ठिकाणी ४०० एमसीएफटीएवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सासवडला दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या वीरमधून ४० लाख आणि घोरपडी पाझर तलावातून १० लाख लिटर पाणी घेण्यात येत आहे. गराडे पाझर तलावातील पाणी यापूर्वीच संपले आहे. गतवर्षी या दिवसांत वीरमध्ये पुरेसा पाणीसाठा होता, तसेच सासवडच्या योजनेची चारी उघडी पडली नव्हती, त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय वढणे यांनी दिली. त्यातही सध्या वादळी वारे किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. २००३-०४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ३५ किमी लांबीची, सुमारे २० कोटी रुपये खर्चाची ही योजना केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली आहे. वीर योजनेची जॅकवेल ही १५ फूट रुंद असून तिची उंची २५ फूट आहे. त्या वेळी असणाऱ्या पंपामधून आजही पाणीउपसा केला जात आहे, या पंपांची पाणीउपसा करण्याची क्षमता आता कमी झाली आहे. त्यामुळे हे पंप पुढील काळात बदलण्यात येणार असून या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून पंप चालविले जाणार आहेत. सध्या वीर योजनेवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्ष भोंडे व उपनगरध्यक्ष वढणे यांनी केले आहे.