शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: September 7, 2022 07:44 IST

पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे.

पुणे : कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने ५० हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होेते. त्यानुसार राज्यातील सुमारे दोन लाख वारसांचे अर्ज मंजूर झाले असून, तब्बल १ हजारांहून अधिक जणांना हे अनुदान दोनदा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संकेतस्थळावर १.४८ लाख जणांच्या मृत्यूची नाेंद- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर राज्यात कोरोनामुळे १.४८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. - केंद्राच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानंतर राज्यात  यासाठी २.६० लाख अर्ज आले. त्यापैकी १.९७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. 

अनेक ठिकाणांहून अर्ज -राज्याने आतापर्यंत या अनुदानापोटी ९८२.२१ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता सर्व जिल्हाधिकारी व आयुक्तांना हे अनुदान त्वरित परत करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे. 

पुण्यात ३१३ अर्जदार -राज्यात अनेकांनी मृत व्यक्ती आपले नातेवाईक दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या १००३ इतकी आहे. दोनदा अनुदान लाटलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यात असे ३१३ अर्जदार आहेत. या सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. 

ज्यांनी दावे केले होते त्यांचे बँक तपशील आहेत. अशांना वैयक्तिक कळविले आहे. अनुदान परत करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास ते वसूल केले जाईल; अन्यथा त्यांचे बँक खाते गोठविण्यात येईल.    - संजय धारूरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस