शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

सणसरला रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: May 8, 2017 02:09 IST

सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी येथील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आवर्तन सोडावे, अखंडित वीजपुरवठा द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज रास्ता रोेको आंदोलन केले.सणसर परिसरातील भूजलपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या परिसरातील वितरीका क्र. ३६ ,३९ ला गेल्या ६५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने नीरा डावा कालव्याच्या वितरिका क्रमांक ३६, ३९ ला लवकर पाणी सोडावे, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी आहे. सणसर व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने या दोन्ही वितरिकांना पाणी सोडावे, त्यासाठी अखंडित वीजपुरवठा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सणसर बंगला येथे पाटबंधारे प्रवेशद्वारासमारे आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, सागर भोईटे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, वसंत जगताप, आबासाहेब निंबाळकर, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, शरद कांबळे, सचिन सपकळ, अक्षय निंबाळकर, किरण गायकवाड, अमोल भोईटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.