शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

वालचंदनगरमध्ये स्वच्छता मोहिमेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय ...

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात खराटा घेऊन या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. वालचंदनगरचे जुने वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

रविवारपासून (दि.७) या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाणार आहे. येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड मित्र मंडळाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. वालचंदनगर परिसराचा गेल्या २० वर्षांपूर्वी मोठा नावलौकिक होता. मात्र तद्नंतर आलेल्या औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. त्यामुळे हळूहळू येथील मूलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखचार्तून परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अतुल तेरखडकर, डॉ. विकास शहा,अंबादास शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चौकट

सध्या या मोहिमेस सुरुवात झाली आहे. गावातील युवक रस्त्यांच्या बाजूचा कचरा गोळा करत आहेत. तर जेसीबीच्या साह्याने स्वच्छता केली जात आहे.

कोट

स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व असून गावचा परिसर स्वच्छ असल्यास गावाचा नावलौकिक मोठा होतो. स्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. युवकांनी सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून इतरांनीही या मोहिमेत सामील होण्याची गरज आहे.

-दत्तात्रय भरणे, दरम्यान यावेळी बोलताना राज्यमंत्री.

---------------------

-------------------------