शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST

-- स्थानिक व भाविकांमध्ये नाराजी : जलचरांना गमवावा लागतोय जीव, जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात -- आळंदी : ...

--

स्थानिक व भाविकांमध्ये नाराजी : जलचरांना गमवावा लागतोय जीव, जलपर्णीच्या विळख्याने पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात

--

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून श्री माउलींच्या समाधीचे दर्शन घ्यावे, अशी येथे दाखल झालेल्या प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. परंतु सध्या भाविकांना इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णीयुक्त व रसायनमिश्रित काळसर पाण्यात स्नान करावे लागत आहे. अनेक भाविकांना इच्छा असूनही पवित्र इंद्रायणीत स्नान न करता फक्त हात जोडून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे इंद्रायणीला निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणीपात्रात दूषित पाण्याचा साठा असून पात्रातील पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी, कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर सांडपाणी बिनधास्तपणे सोडले जात असल्याने जलपर्णीचाही विळखा अधिक गुंफत चालला आहे. परिणामी स्थानिक नागरिक तसेच भाविकांना इंद्रायणीतील पाण्यापासून दूर राहावे लागत आहे. मात्र रसायनमिश्रित पाण्यामुळे नदीतील जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे.

--

कोट

: श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या दोन्हीही ठिकाणी वर्षभर लाखो वारकरी दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला जाताना पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. तसेच वारकरी नदीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशनही करतात. परंतु इंद्रायणी नदी सध्या प्रचंड प्रदूषित झाली असून त्यात स्नान करणं सोडाच; पण हात-पाय धुणंही अपायकारक बनले आहे.

“ देवदर्शनासाठी परगावाहून आळंदीत आल्यानंतर येथे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात ही माफक अपेक्षा आमच्यासारख्या भाविकाची असते. नदीतील पाणी दुर्गंधीयुक्त व जलपर्णीमिश्रित असल्याने मनात इच्छा असूनही पवित्र इंद्रायणीत स्नान करता आले नाही.

- गोरख सबनीस, भाविक मुंबई.

--

फोटो ओळ : अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे, तर रसायनमिश्रित पाण्यामुळे जलचरांना प्राण गमवावे लागत आहे.