शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

कत्तलखान्याचा मंजूर निधी इतर विकासकामांना वर्ग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : जुन्नरमधील कत्तलखान्यासाठी मंजूर झालेला निधी इतर विकासकामांसाठी वर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जुन्नर : जुन्नरमधील कत्तलखान्यासाठी मंजूर झालेला निधी इतर विकासकामांसाठी वर्ग केला जाईल, याचे सुधारित आदेश लवकरच दिले जातील. कत्तलखान्यासाठी मी निधी आणला असा अपप्रचार करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार कत्तलखान्यासाठी शासनाकडून निधी आला आहे. यासंदर्भात माझी बदनामी केली जात आहे, ती चुकीची आहे. हा निधी आणण्यात माझा, खासदार अमोल कोल्हे यांचा तसेच नगराध्यक्ष श्याम पांडे यांचा कोणाचाही सहभाग नाही, असा खुलासा आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

शिवजन्मभूमीत कत्तलखाना करणे योग्य आहे का, असा सवाल विचारत हिंदुत्ववादी संघटना तसेच विरोधकांकडून समाजमाध्यमावर आमदार बेनके यांना ट्रोल करण्यात आले होते. या संदर्भात खुलासा करण्यासाठी आमदार बेनके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी गटनेते फिरोज पठाण, नगरसेवक भाऊसाहेब देवाडे, शहराध्यक्ष धनराज खोत, युवक अध्यक्ष भुूण ताथेड आदी उपस्थित होते. बेनके म्हणाले २०१५-१६ साली तत्कालीन सरकारने सुधारित कत्तलखान्यासाठी ७० ते ७५ लाख रुपये मंजूर केले होते. यासाठी आणलेली यंत्रसामग्री मशीनरी नगरपालिकेच्या ताब्यात आहे, तिथे उभी आहे. त्यावेळी या कामासाठी ५५ ते ६० लाख रुपये खर्च झाले होते. परंतु जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाने मंजूर केले नसल्याने हे काम अपूर्ण राहिले होते. मागील महिन्यात जुन्नरच्या मुस्लिम नगरसेवकांनी कत्तलखाना सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्र दिले होते. त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, मी कत्तलखान्यासाठी निधी आणल्याचा अपप्रचार समाजमाध्यमांवर करण्यात येऊ लागला, असे बेनके म्हणाले.

आमदार बेनके यांचा हा दावा माजी आमदार शरद सोनवने यांनी पत्रकार परिषद घेत खोडून काढला. सोनवने म्हणाले, कत्तलखान्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निधी आणला हा बेनके यांचा दावा खोटा आहे. कत्तलखान्यासाठी १५ एप्रिल २०१४ ला पश्चिम घाट योजने अंतर्गत निधी मागण्यात आला. त्या वेळी नगर पालिकेचे नगराध्यक्ष व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. आपण आमदार असताना हा निधी आलेला नाही. कत्तलखान्या साठीच निधीचे काय करायचे, कत्तल खाना करायचा का की नाही याचा निर्णय हा विद्यमान आमदारांनीच घ्यावा, अशी टिप्पणी सोनवने यांनी केली.

चौकटीसाठी मजकुर

अधिकृत कत्तलखाना बंद असल्याने बऱ्याच ठिकाणी खाजगी घरात गोवंशीय प्राण्यांची अवैधरीत्या कत्तल करण्यात येते. कत्तल करत असताना रक्त, टाकाऊ मांस हे गटारातून सोडले जाते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते, प्रदूषण होते. जातीय तणाव वाढतो, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. यासाठी शासनाचे, नगरपालिकेचे नियंत्रण असणारा कत्तलखाना असावा. गोवंशहत्येला बंदी आहेच. कत्तलखान्यात फक्त म्हैसवर्गीय प्राण्यांची कत्तल करण्यात येईल, असा एक मतप्रवाह आहे. तर शिवजन्मभूमीत कत्तलखाना नसावाच असे हिंदुत्ववादी संघटनाचे मत आहे. यातून अवैधरीत्या होत असलेली गोवंश प्राण्यांची कत्तल चोरून लपून होतच राहणार हे देखील वास्तव आहे.