शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

संयमाचा बांध फुटतोय

By admin | Updated: November 14, 2016 07:02 IST

सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत,

पुणे : सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत, आज तरी सुट्टे पैसे द्या ना, भाजीपाला घेण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत; कसेबसे चार दिवस काढले, पाचवा दिवस उगवला तरीही बँका सुरळीतपणे सुरू नाहीत. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी फक्त सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागत आहेत, आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा; आता आमचा संयमाचा बांध फुटू लागला आहे, अशा भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या नोटा बंदच्या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होत असून बँक, पोस्ट आॅफिसच्या दारात तासन्तास उभे राहून सुट्टे पैसे मिळवण्यासाठी पहाटेपासून यावे लागत आहे. नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे भाजीपाला, दूध खरेदी करण्यापासून साधा वडापाव खाण्यासही अडचणी येत आहेत. शहरातील काही बँका, पोस्ट आॅफिस पाचवा दिवस उगवला तरीही अद्याप सुरळीत सुरू झालेल्या नाहीत. निवडक बँकांचे एटीएम मशिन सुरू झाल्या तरी त्यासमोर लांबचलांब रांगा दिसून आल्या. एटीएममधून एका व्यक्तीला केवळ दोन हजार रुपपांपर्यंत रक्कम काढता येत होते. काही तासांतच ही रक्कम संपत असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले. नोटा बंदच्या निर्णयामुळे शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी बँकांपर्यंत पैसे न पोहोचल्यामुळे शहरातील अनेक बँका सुरूच झाल्या नाहीत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही बँका उशिरा सुरू झाल्या तर काही बँका पैसे संपल्याने दुपारी ३ वाजताच बंद झाल्या. भांडारकर रस्त्यासह घोले रस्त्यावरील काही बँकांचे एटीएम केंद्र सुरू होते. बाजीराव रस्त्यावरील एटीएम बंद असल्याने नागरिक एटीएम सुरू होण्याची प्रतिक्षा करताना दिसून आले. तासंतास रांगेत उभे राहून हातात १०० रुपयांच्या २० नोटा पडल्याचे पाहून काही नागरिकांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.बँका व पोस्ट आॅफिसमधून पैसे बदलून मिळतील, असे स्पष्ट केले असताना काही नागरिकांना मर्यादित पैसे दिले जात होते.पैसे बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही बँकांकडून केवळ ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती. त्यामुळे ही रक्कम संपल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत उभे रहावे लागणार,या चिंतेने घरी जात होते. (प्रतिनिधी)