शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

संयमाचा बांध फुटतोय

By admin | Updated: November 14, 2016 07:02 IST

सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत,

पुणे : सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत, आज तरी सुट्टे पैसे द्या ना, भाजीपाला घेण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत; कसेबसे चार दिवस काढले, पाचवा दिवस उगवला तरीही बँका सुरळीतपणे सुरू नाहीत. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी फक्त सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागत आहेत, आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा; आता आमचा संयमाचा बांध फुटू लागला आहे, अशा भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या नोटा बंदच्या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होत असून बँक, पोस्ट आॅफिसच्या दारात तासन्तास उभे राहून सुट्टे पैसे मिळवण्यासाठी पहाटेपासून यावे लागत आहे. नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे भाजीपाला, दूध खरेदी करण्यापासून साधा वडापाव खाण्यासही अडचणी येत आहेत. शहरातील काही बँका, पोस्ट आॅफिस पाचवा दिवस उगवला तरीही अद्याप सुरळीत सुरू झालेल्या नाहीत. निवडक बँकांचे एटीएम मशिन सुरू झाल्या तरी त्यासमोर लांबचलांब रांगा दिसून आल्या. एटीएममधून एका व्यक्तीला केवळ दोन हजार रुपपांपर्यंत रक्कम काढता येत होते. काही तासांतच ही रक्कम संपत असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले. नोटा बंदच्या निर्णयामुळे शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी बँकांपर्यंत पैसे न पोहोचल्यामुळे शहरातील अनेक बँका सुरूच झाल्या नाहीत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही बँका उशिरा सुरू झाल्या तर काही बँका पैसे संपल्याने दुपारी ३ वाजताच बंद झाल्या. भांडारकर रस्त्यासह घोले रस्त्यावरील काही बँकांचे एटीएम केंद्र सुरू होते. बाजीराव रस्त्यावरील एटीएम बंद असल्याने नागरिक एटीएम सुरू होण्याची प्रतिक्षा करताना दिसून आले. तासंतास रांगेत उभे राहून हातात १०० रुपयांच्या २० नोटा पडल्याचे पाहून काही नागरिकांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.बँका व पोस्ट आॅफिसमधून पैसे बदलून मिळतील, असे स्पष्ट केले असताना काही नागरिकांना मर्यादित पैसे दिले जात होते.पैसे बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही बँकांकडून केवळ ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती. त्यामुळे ही रक्कम संपल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत उभे रहावे लागणार,या चिंतेने घरी जात होते. (प्रतिनिधी)