शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उत्तमनगरला खरेदीसाठी ्एकच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:09 IST

लॉकडाऊन लागणार की निर्बंध अधिक कडक होणार ह्या अनिश्चितते मूळे लोकांचा खरेदीसाठी एकच गोंधळ उडून तुंबळ गर्दी झाल्याचे चित्र ...

लॉकडाऊन लागणार की निर्बंध अधिक कडक होणार ह्या अनिश्चितते मूळे लोकांचा खरेदीसाठी एकच गोंधळ उडून तुंबळ गर्दी झाल्याचे चित्र उत्तमनगरसह शहरात अनेक ठिकाणी पहावयास मिळाले .शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी लोकांनी गरजोपयोगी गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत एकूणच सोशल डीस्टॅसिंग चा फज्जा पाडल्याचे दिसून आले.

लॉकडाऊन चा विरोध चारीही बाजूनी होत आहे परंतु अचानक जर लोकडाऊन जाहीर केला तर मागच्या वर्षी सारखा त्रास होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेऊन सर्व गोष्टी जमा करण्यावर लोकांचा कल दिसून आला.

लोकांना लोकडाऊन नको आहे,पूर्ण बाजारपेठ बंद न करता लोकांना जर कोरोना पासून बचाव कसा करायचा ह्याच्या उपाययोजना केल्या तर कोरोनाचा प्रसार रोखण्यास काही प्रमाणात हातभार लागेल.मागील एक वर्षांपासून आलेल्या ह्या संकटामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून आता परत जर सर्व बंद केले तर लोकांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न उभे राहतील.अनेक जणांना लॉकडाऊन बद्दल विचारले असता त्यांना लोकडाऊन नको असून त्यांना सरकार कडून मदत मिळण्याचे आवाहन केले आहे.सरकार काय निर्णय घेणार ह्यावर बऱ्याच जणांचे भवितव्य अवलंबून आहे.कोरोना चा फैलाव ज्या पद्धतीने होत आहे ते पाहता कडक निर्बंध लागणे गरजेचे आहे,कोरोनाचा आकडा एकीकडे वेगाने वाढत असताना लोकांच्या बरे होण्याचे प्रमाण ही सुखावह आहे.लोकांनीही आपापली जवाबदारी स्वीकारून कारण नसताना गर्दी न करणे,मास्क वापरले आणि ठरवून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले तरच आपण ह्या कोरोना रुपी राक्षसाचा अंत करू शकतो.