शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राजकारणाला आलेला शिळेपणा संभाजीराजे घालवू शकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यास ताजेपणा येईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “पवारांचे राजकारण चाळीस वर्षे पाहतोय. ते नेहमी ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा करुया.” खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी (दि. २९) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे राज्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. येणार्‍या सरकारला काही वेळ राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका हाच सध्या कायदेशीर मार्ग आहे.

“आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल’ होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत,” असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावरील चर्चेत संसदेत सांगितले की, “आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकटआंबेडकर-संभाजीराजे एकत्र

“राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत ? शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले,” असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.