शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राजकारणाला आलेला शिळेपणा संभाजीराजे घालवू शकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यास ताजेपणा येईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “पवारांचे राजकारण चाळीस वर्षे पाहतोय. ते नेहमी ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा करुया.” खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी (दि. २९) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे राज्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. येणार्‍या सरकारला काही वेळ राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका हाच सध्या कायदेशीर मार्ग आहे.

“आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल’ होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत,” असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावरील चर्चेत संसदेत सांगितले की, “आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकटआंबेडकर-संभाजीराजे एकत्र

“राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत ? शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले,” असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.