शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडब्ल्यूएस’साठी संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

राज्य सरकारने ही मागणी त्वरीत मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा ...

राज्य सरकारने ही मागणी त्वरीत मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. ५) दिला. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र असूनही ते दिले जात नसल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. याची प्रतिक्रीया उमटल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

-----------------

मराठा महासंघाचा आरोप तथ्यहीन असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा

शरद पवारांची तरफदारी : प्रवीण गायकवाड यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘ठरवले असते तर शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले,’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुमारे चाळीस वर्षे अध्यक्ष असलेल्या अँड. शशिकांत पवार यांनी नुकतेच व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडने मात्र अँड. शशिकांत पवार यांचे मत खोडून काढले आहे.

“मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे केला जात आहे. मात्र तो तथ्यहीन आहे,” असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, शरद पवार यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरील आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री असताना पवार यांनी १९७८-८० मध्ये राज्यातील सर्व मागास प्रवर्गांना आर्थिक निकष लावून ८० टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले होते. मात्र १९८५ मध्ये हे आरक्षण रद्द झाले.

सन १९८० ते ९० या दशकात मराठा महासंघाने मंडल आयोगाला विरोध करायला सुरुवात केली. याचवेळी मराठा महासंघाने आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी लावून धरल्याचे गायकवाड म्हणाले. त्यावेळी ‘मंडल’च्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात २७ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. १९९३ पर्यंत हे खटले चालले. सन १९८९-९१ या काळात पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा हा घटनाक्रम आहे. मात्र आरक्षण कोर्टात अडकल्याने पवारांनी ठरवले असते तरी ते देऊ शकले नसते, असे गायकवाड म्हणाले.

चौकट

दोन्ही पवारांमध्ये त्यावेळी नव्हते धाडस

शरद पवार मुख्यमंत्री असताना देशात सर्वात प्रथम ओबीसी आरक्षण लागू केले हे खरे. पण त्यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करता आले असते का, असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केला. त्या काळात मराठा समाज स्वत:ला मागासवर्गीय म्हणवून घेण्यास तयार नव्हता. त्यांना ओबीसीत टाकण्याचे धाडस ना पवार करु शकले असते ना अँड शशिकांत पवार असी टिप्पणी गायकवाड यांनी केली.