शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडब्ल्यूएस’साठी संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

राज्य सरकारने ही मागणी त्वरीत मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा ...

राज्य सरकारने ही मागणी त्वरीत मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. ५) दिला. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र असूनही ते दिले जात नसल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. याची प्रतिक्रीया उमटल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

-----------------

मराठा महासंघाचा आरोप तथ्यहीन असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा

शरद पवारांची तरफदारी : प्रवीण गायकवाड यांची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘ठरवले असते तर शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले,’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुमारे चाळीस वर्षे अध्यक्ष असलेल्या अँड. शशिकांत पवार यांनी नुकतेच व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडने मात्र अँड. शशिकांत पवार यांचे मत खोडून काढले आहे.

“मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे केला जात आहे. मात्र तो तथ्यहीन आहे,” असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, शरद पवार यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरील आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री असताना पवार यांनी १९७८-८० मध्ये राज्यातील सर्व मागास प्रवर्गांना आर्थिक निकष लावून ८० टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले होते. मात्र १९८५ मध्ये हे आरक्षण रद्द झाले.

सन १९८० ते ९० या दशकात मराठा महासंघाने मंडल आयोगाला विरोध करायला सुरुवात केली. याचवेळी मराठा महासंघाने आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी लावून धरल्याचे गायकवाड म्हणाले. त्यावेळी ‘मंडल’च्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात २७ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. १९९३ पर्यंत हे खटले चालले. सन १९८९-९१ या काळात पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा हा घटनाक्रम आहे. मात्र आरक्षण कोर्टात अडकल्याने पवारांनी ठरवले असते तरी ते देऊ शकले नसते, असे गायकवाड म्हणाले.

चौकट

दोन्ही पवारांमध्ये त्यावेळी नव्हते धाडस

शरद पवार मुख्यमंत्री असताना देशात सर्वात प्रथम ओबीसी आरक्षण लागू केले हे खरे. पण त्यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करता आले असते का, असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केला. त्या काळात मराठा समाज स्वत:ला मागासवर्गीय म्हणवून घेण्यास तयार नव्हता. त्यांना ओबीसीत टाकण्याचे धाडस ना पवार करु शकले असते ना अँड शशिकांत पवार असी टिप्पणी गायकवाड यांनी केली.