शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

...त्या हातांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:36 IST

त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहालाच, संपतो सायंकाळी साडेसहाला! सूर्योदय ते सूर्यास्त अशा वेळेत ते काम करतात.

पुणे : त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहालाच, संपतो सायंकाळी साडेसहाला! सूर्योदय ते सूर्यास्त अशा वेळेत ते काम करतात. त्यात कधीही खंड पडत नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ते त्या वेळी येणार व त्यांचे काम करणारच! त्यांना रविवारचीच काय कोणतीही सुटी नसते. न कंटाळता, न थकता, कामचुकारपणा न करता ते आनंदाने आपले कर्तव्य करीत असतात. आनंदाने व अभिमानानेही!सगळ्या सरकारी इमारतींवर रोजच्या रोज ध्वजारोहण व ध्वजावतरण होत असते. ते करणारे हात असतात जमादार, शिपाई या वर्गातील. वर्षाचे सर्व दिवस ते हे काम करीत असतात. १५ आॅगस्ट व २६ जानेवारी हे दोन दिवस सोडून. या दोन दिवशी महत्त्वाच्या पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. नेमके त्याच दिवशी हे दोन हात विसरले जातात. पण त्यांना त्याची खंत नाही, उलट देशाप्रती रोज सेवा अर्पण करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे.महापालिकेच्या इमारतीवर मधुकर घोरपडे, सर्जेराव नागवडे, रमेश कदबाने, अशोक बनकर यांच्याकडे ही जबाबदारी आहे. सूर्योदय व सूर्यास्त यांची वेळ त्यांच्या समोरच्या फलकावर रोज लिहून ठेवलेली असते. ती अर्थातच रोज बदलते. बरोबर त्याच वेळेत मुख्य इमारतीवर जाऊन ध्वजारोहण व ध्वजावतरण ही दोन्ही कामे ते करीत असतात. दोन्ही वेळा झेंड्याला कडक सलामी दिली जाते. त्यांच्याशिवाय अन्य जमादार, शिपाई यांनाही याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वेळ चुकवायची नाही, हा या कामातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग. देशाचा झेंडा फडकावताना खरोखरच छाती अभिमानाने फुलून येते, असे या सर्वांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या इमारतीवर गेल्या १२ वर्षांपासून सुरेशवहिले हे काम करतात. धुवाधार पावसातही ध्वजारोहण वध्वजावतरण अशी दोन्ही कामे वेळेवर केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते मराठा लाईट इन्फंट्रीमधून निवृत्त झाले व नंतर सरकारी सेवेत दाखल झाले. त्यामुळे देशाचा अभिमान तर त्यांच्या नसानसांत भिनलेला आहे. सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी त्यांनी एक कॅलेंडरच आपल्या मोबाईलमध्ये घेतले आहे. त्या वेळेनुसार ते बारा वर्षे बरोबर ही दोन्ही कामे न चुकता करतात. कर्तव्य बजावल्याचे समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विजय जक्का, रूपेश सोनवणे यांच्याकडे ही जबाबदारी आहे. जक्का सकाळी ध्वजारोहणाचे व सोनवणे ध्वजावतरणाचे काम करतात. दोघांचाही ध्वजसंहिंतेचा खास अभ्यास आहे. ध्वज कसा काढायचा व ठेवायचा याची सर्व माहिती आहे. त्याप्रमाणेच काम करतो असे ते म्हणाले. देशाची अस्मिता असलेला झेंडा फडकावताना व त्याला सलामी देताना मिळते ते समाधान अन्य कोणत्याही कामाने मिळणारे नाही, असे त्यांनी सांगितले.दिसायला सोपे वाटणारे हे काम प्रत्यक्षात मात्र अवघड आहे. ध्वजसंहितेचे सर्व नियम पाळूनच ते करावे लागते. ध्वजाची घडी कशी घालायची व कशी उलगडायची, यापासून सर्व काही ठरलेले आहे. सूर्यास्तानंतर ध्वज फडकता राहिला तर तो अवमान समजला जातो, त्यामुळे फार काळजीपूर्वक हे काम करावे लागते. ध्वज फडकताना तो बरोबर फडकेल, त्याचा रंगक्रम बरोबर असेल, हेही पाहावे लागते.