शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

सैनिकांच्या अतुलनीय धाडसासाठी सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे:- प्रत्येक जवान हा मायभूमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. आर्मी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे:- प्रत्येक जवान हा मायभूमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांना अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. आपल्या सीमा जवळून पाहता आल्या. सैनिकांच्या अतुलनीय धाडसासाठी त्यांना सॅल्यूट करावेसे वाटते अशी भावना माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.

कारगिल विजय दिवसा निमित्त (दि.26) आणि गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्वा निमित्त सरहद संस्था आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने कारगिल सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. तसेच नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुताम्यांना सुभाष भामरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शनिवार वाडा येथेून प्रांरभ झालेल्या या दौडची घोरपडी येथील सदर्न कमांड नॅशनल वॉर मेमोरियल येथे समाप्ती झाली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भाजपचे पुणे शहर संघटन सरचिटणीस आणि कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे समन्वयक राजेश पांडे, कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख आणि तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे आयोजक संतसिंग मोखा, समितीचे कार्यकारी अध्यक्ष चरणजित सिंग सहानी,समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र वाधवा, मॅरेथॉनचे मुख्य संयोजक अरविंद बिजवे, समितीचे सदस्य अमर छाबडा, नरिंदर पाल सिंग बक्षी, सुरिंंदर सिंग धुपर, दलजित सिंग रँक, अर्हम फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारीया, युवराज शहा उपस्थित होते.

----------------------