शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखाना राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ६५ ...

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखाना राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ६५ कोटी ७५ लाखांना विकला गेला आहे. इतर कारखाने केवळ १०-१२ कोटींना विकले गेलेत. जरंडेश्वरमध्ये काहीही चुकीचे घडले नाही. चौकशीमध्ये सर्व गोष्टी समोर येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई केली आहे. या सहकारी साखर करखान्याशी अजित पवार यांचा संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीरच झाली आहे. तसेच, बँकेला फायदा झाला असल्याचे अजित पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, सुरुवातीला हा कारखाना मुंबईच्या गृह कमोडिटी ट्रेडर्सने घेतला होता. त्यानंतर पुण्यातील भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) चालवायला घेतला होता. त्यांना त्यात चार कोटींचा तोटा झाला. त्यानंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी तो घेतला. ही सर्व प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती. त्यात काहीही चुकीचे घडले नव्हते. कारखाना व्यवस्थित सुरू होता. त्यावर हजारो शेतकऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुरू होता. यापूर्वीही चार वेळा चौकशी झाली आहे. त्यात काहीही तथ्य आढळले नाही. मात्र, ही कारवाई शेतकऱ्यांना त्रासदायक आहे.

---

आंबिल ओढा कारवाईशी माझा संबंध नाही

आंबिल ओढा येथे केलेली कारवाई ही पुणे महापालिका प्रशासनाने केली आहे. त्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणतीही जबाबदारी कधीही झटकत नाही. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण दिशाभूल करू नये, असे अजित पवार म्हणाले.

-----

महापौरांना मी निमंत्रण दिले होते

काम करताना आम्ही सर्वांना सोबत घेऊनच करतो. प्रत्येकाचे मत जाणून घेतो. व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिले होते. ते जॉईन झाले नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे निमंत्रणाचा वाद नाहक आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे पवार म्हणाले.

----