शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखाना राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ६५ ...

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १४ कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखाना राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ६५ कोटी ७५ लाखांना विकला गेला आहे. इतर कारखाने केवळ १०-१२ कोटींना विकले गेलेत. जरंडेश्वरमध्ये काहीही चुकीचे घडले नाही. चौकशीमध्ये सर्व गोष्टी समोर येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई केली आहे. या सहकारी साखर करखान्याशी अजित पवार यांचा संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीरच झाली आहे. तसेच, बँकेला फायदा झाला असल्याचे अजित पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, सुरुवातीला हा कारखाना मुंबईच्या गृह कमोडिटी ट्रेडर्सने घेतला होता. त्यानंतर पुण्यातील भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) चालवायला घेतला होता. त्यांना त्यात चार कोटींचा तोटा झाला. त्यानंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी तो घेतला. ही सर्व प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती. त्यात काहीही चुकीचे घडले नव्हते. कारखाना व्यवस्थित सुरू होता. त्यावर हजारो शेतकऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुरू होता. यापूर्वीही चार वेळा चौकशी झाली आहे. त्यात काहीही तथ्य आढळले नाही. मात्र, ही कारवाई शेतकऱ्यांना त्रासदायक आहे.

---

आंबिल ओढा कारवाईशी माझा संबंध नाही

आंबिल ओढा येथे केलेली कारवाई ही पुणे महापालिका प्रशासनाने केली आहे. त्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणतीही जबाबदारी कधीही झटकत नाही. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण दिशाभूल करू नये, असे अजित पवार म्हणाले.

-----

महापौरांना मी निमंत्रण दिले होते

काम करताना आम्ही सर्वांना सोबत घेऊनच करतो. प्रत्येकाचे मत जाणून घेतो. व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिले होते. ते जॉईन झाले नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे निमंत्रणाचा वाद नाहक आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे पवार म्हणाले.

----