शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी

By admin | Updated: March 16, 2017 01:59 IST

साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते.

बारामती : साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते. तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने जीवनवाहिनीप्रमाणे असतात, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.बारामती येथे १२वे राज्यस्तरीय मराठी साहित्यिक व कलावंत संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, की साहित्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. साहित्यामुळे संस्कृती कळते. सर्व जगात मराठी साहित्याचा गौरव होत असताना पाश्चिमात्य संस्कृती, साहित्याचा होत असलेला अतिरेक थांबला पाहिजे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठी साहित्य हे आदर्शवादी व गौरवास्पद आहे. त्याचा आदर्श प्रत्येक साहित्यकाने घेण्याचे आवाहन आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.साहित्य संमेलने ही काळाची गरज असून साहित्यिक, कलावंत यांना ऊर्जा देण्यासाठीच गेल्या सहा वर्षांपासून हा लढा चालू आहे. शासन मदत करो अथवा न करो; परंतु साहित्यिकांना संमेलनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष बी. डी. गायकवाड यांनी सांगितले. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी १० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. अनिल सातव यांनी आभार मानले.या वेळी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, किशोर शहा, नेहा शहा, संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, कविसंमेलनाचे अध्यक्ष लोककवी मदन देगावकर, स्वागताध्यक्षा नीता बारवकर, रानकवी जगदीप व बी. डी. गायकवाड, अनिल सातव, सचिव राधिका अनपट, नाजनील शेख, उमेश शिंदे, प्रदीप कोथमिरे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.