शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी

By admin | Updated: March 16, 2017 01:59 IST

साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते.

बारामती : साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते. तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने जीवनवाहिनीप्रमाणे असतात, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.बारामती येथे १२वे राज्यस्तरीय मराठी साहित्यिक व कलावंत संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, की साहित्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. साहित्यामुळे संस्कृती कळते. सर्व जगात मराठी साहित्याचा गौरव होत असताना पाश्चिमात्य संस्कृती, साहित्याचा होत असलेला अतिरेक थांबला पाहिजे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठी साहित्य हे आदर्शवादी व गौरवास्पद आहे. त्याचा आदर्श प्रत्येक साहित्यकाने घेण्याचे आवाहन आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.साहित्य संमेलने ही काळाची गरज असून साहित्यिक, कलावंत यांना ऊर्जा देण्यासाठीच गेल्या सहा वर्षांपासून हा लढा चालू आहे. शासन मदत करो अथवा न करो; परंतु साहित्यिकांना संमेलनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष बी. डी. गायकवाड यांनी सांगितले. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी १० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. अनिल सातव यांनी आभार मानले.या वेळी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, किशोर शहा, नेहा शहा, संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, कविसंमेलनाचे अध्यक्ष लोककवी मदन देगावकर, स्वागताध्यक्षा नीता बारवकर, रानकवी जगदीप व बी. डी. गायकवाड, अनिल सातव, सचिव राधिका अनपट, नाजनील शेख, उमेश शिंदे, प्रदीप कोथमिरे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.