शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य परिषद ही लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

डॉ. राजा दीक्षित : मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन पुणे : साहित्य परिषदेच्या पारंब्या आज ग्रामीण-आदिवासी भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ...

डॉ. राजा दीक्षित : मसापच्या ११५ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन

पुणे : साहित्य परिषदेच्या पारंब्या आज ग्रामीण-आदिवासी भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. समाजाचे मंडळीकरण झाले पाहिजे, असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणत असत. परिषदेसारख्या संस्था या एका अर्थी अशा मंडळी आणि लोकशिक्षणाच्या सांस्कृतिक प्रयोगशाळा असतात, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे परिषदेच्या ११५ व्या वर्धापनदिनाचा जाहीर कार्यक्रम होऊ शकला नाही. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते संस्थेचे आद्य प्रेरक न्या. रानडे, लोकमान्य टिळक आणि न. चि. केळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन केले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे आणि डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘आधुनिक महा राष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपला महत्त्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. तिच्या स्थापनेच्या वेळी लोकमान्य टिळक म्हणाले होते की, केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात, तर कर्ते पुरुष पुढे यावे लागतात. परिषदेचा इतिहास म्हणजे अशा कर्त्या स्त्री-पुरुषांच्या साहित्यविषयक समाजकार्याची कहाणी आहे. द. वा. पोतदार, नी. शं. नवरे आणि म. श्री. दीक्षित यांनी लिहिलेले परिषदेचे इतिहास याची साक्ष देतात. अनेक तामोयुगे पचवून मानवजात पुढे गेली आहे आणि साहित्य फुलत राहिले आहे, याचे भान आपण सतत ठेवले पाहिजे. साहित्यविश्व जेवढे सकस, सजग आणि बहुमुखी होईल, तेवढी आपली सामाजिक मानसिकता निकोप होऊ शकेल.'',

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ''कोरोना संकटाचे साहित्य क्षेत्रावरही दूरगामी परिणाम झाले आहेत. भविष्यात साहित्य संस्था, लेखक, प्रकाशक, संपादक, चित्रकार, मुद्रितशोधक, छपाई प्रक्रियेतील सर्व घटक, ग्रंथ वितरक, ग्रंथ विक्रेते आणि साहित्य रसिक यांनी परस्परांशी सतत संवाद साधून सामूहिक प्रयत्नातून येणाऱ्या आव्हानांचा सामना केला पाहिजे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत आजवर परिषदेची वाटचाल झाली आहे. यापुढेही होत राहील.'' प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

------

मश्रींच्या आठवणींने गहिवरले राजा दीक्षित

मिलिटरी अकाउंट्समधील नोकरी सोडून साहित्य परिषदेवरील प्रेमापोटी ज्येष्ठ साहित्य सेवक म. श्री. दीक्षित परिषदेच्या कार्यालयात सेवक म्हणून रुजू झाले. ते ६७ वर्षे परिषदेशी संबंधित होते. माझा विवाह आर्थिक अडचणीमुळे मी नोंदणी पद्धतीने केला आणि जमवलेल्या रकमेतून मी आणि म. श्री. दीक्षित परिषदेचे आजीव सभासद एकाचवेळी झालो, अशी आठवण सांगताना डॉ. राजा दीक्षित गहिवरले.