शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

साहित्य महामंडळही आमदारकीच्या शर्यतीत

By admin | Updated: February 11, 2017 02:19 IST

राज्यात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असताना आता अखिल भारतीय साहित्य महामंडळही आमदारकीच्या शर्यतीत उतरले आहे!

पुणे : राज्यात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असताना आता अखिल भारतीय साहित्य महामंडळही आमदारकीच्या शर्यतीत उतरले आहे! राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्तीत सहकार आणि समाजसेवेलाच प्राधान्य दिले जात असून कला, साहित्य व विज्ञानावर अन्याय होत असल्याची टीका महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालजंद्र जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या क्षेत्रातील मान्यवरांचा राज्याला उपयोग नाही, असे शासनाने प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे, अशी खोचक मागणीही त्यांनी केली. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, रमेश राठिवडेकर, अनिल कुलकर्णी, राजन लाखे आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘‘घटनेत तरतूद असतानही नियुक्त्या होत नसतील, घटनेचा अवमान करण्यापेक्षा ही तरतूदच काढून टाका. सांस्कृतिक धोरणासाठी शासनाकडून नवा पैसा खर्च होत नाही. साहित्य संमेलनात ठराव झाल्यानंतर पाठपुरावा करूनही पुढे हालचाली होत नाहीत. मराठी भाषेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याबाबत महामंडळाच्या सदस्यांकडेच इच्छाशक्ती नाही, इतरांना काय दोष देणार? महामंडळाच्या सर्वसाधारण सभेलाही मोजक्या सदस्यांची उपस्थिती असते.’’ (प्रतिनिधी)