शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

लस आणण्याची घाई अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत ...

डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार

पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात लस येण्यासाठी दोन-तीन महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. लस उशिरा आली तरी चालेल पण ती सुरक्षित असायला हवी. लस आणण्यात होत असलेली घाई अयोग्य आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यावेळी उपस्थित होते.

डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, प्रियांका चौधरी, अमोल काळे, प्रमिला लोहकरे, क्रांतीकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

डॉ. भोंडवे म्हणाले, “सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी १३० कोटी लोकसंख्येपैकी किमान ९१ कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे यावर भर देणे गरजेचे आहे.” गणेश चप्पलवार यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले

----------------------------