शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा पंगू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू -- अयाज तांबोळी : डेहणे सध्या कोरोना महामारीचे संकट, आदिवासी भागात उद्भवलेले साथीचे ...

भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू

--

अयाज तांबोळी : डेहणे

सध्या कोरोना महामारीचे संकट, आदिवासी भागात उद्भवलेले साथीचे रोग अशा काळात आरोग्य यंत्रणा तगडी असणे गरजेचे आहे, परंतु सध्याचे उलट चित्र खेडच्या पश्चिम भागात पाहावयास मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या व वैद्यकीय अधिकारी यांच्या अनास्थेमुळे डेहणे आरोग्य केंद्रात अनेक रुग्णांचा अक्षरशः बळी जात आहे. मार्च महिन्यात धामणगाव येथील अर्भकाचा डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गर्भात मृत्यू झाला व सोमवारी (दि.२०) भिवेगाव येथील महिलेचा सर्पदंशामुळे झालेल्या मृत्युमुळे आदिवासींच्या आरोग्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोग्य यंत्रणा पंगू झाल्याचेच चित्र आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे असताना, वर्ग एकचे अधिकारी पद रिक्त आहे. एकच डॉक्टर २५ गावांच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी घेताना दिसत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. डेहणे आरोग्य केंद्रातील वर्ग एकचे पद रिक्त आहे. त्यामुळे अशा आरोग्य केंद्राची जबाबदारी लगतच्या या केंद्रातील डॉक्टरांकडे सोपविण्यात येते, त्याचा परिणाम विशेषत: ग्रामीण आरोग्यसेवेवर होत आहे. उर्वरित कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालय व उपकेंद्रात असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या अशा केंद्रातील कार्यरत कर्मचारी कोविड केअर सेंटरवर नियुक्ती दिली जात असल्याने, इतर आजार व साथीच्या काळात कर्मचाऱ्यांचा होणारा तुटवडा पाहता, आरोग्य यंत्रणा पंगू झाली आहे.

डेहणे आरोग्य केंद्र तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील म्हणून ओळखले जाते. सर्पदंश, नैसर्गिक आपत्ती अशा लहान-मोठ्या घातपातापासून तर अपघातांतील रुग्णांसह आदिवासी, डोंगराळ भागातील दैनंदिन ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी तत्पर सेवा मिळणे गरजेचे आहे. अशाही स्थितीत सन २००६ पासून या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हे प्रमुख पद रिक्त आहे. एक वैद्यकीय अधिकारी, १४ आरोग्य कर्मचाऱ्यांवर या रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.धैर्यशील पंडित या एकमेव वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली डेहणे आरोग्य केंद्राचा कारभार सध्या सुरू आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठी संख्या आहे.

----------------------------

बिरसा ब्रिगेडकडून मोर्चा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत व त्यांचा जीव जात असल्याचा आरोप करत बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी आज मोर्चा काढला. यावेळी त्यांनी डाॅ.धैर्यशील पंडित यांच्यावर प्रश्नांना भडिमार करत, कर्मचारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, ब्रिगेडचे अध्यक्ष एकनाथ तळपे, नामदेव गवारी, संतोष मराठे, गणेश भोजणे, प्रकाश मुऱ्हे, सचिव लक्ष्मण मदगे भरत बांगर व शेकडो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.