शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

ग्रामीण भागात आता पुन्हा पेटू लागल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी ...

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले

नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले; मात्र गत काही महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, तसेच सबसिडीही बंद झाल्याने, उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असून धुरामुळे त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसू आले आहेत.

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता सिलिंडर महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने, आर्थिक संकट गडद होत असून, परिणामी घरोघरी वापर असलेला गॅस भरून आणण्यासाठी पैसे नसल्याने, ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी वर्ग पुन्हा चुलीकडे वळाला आहे.

ग्रामीण भागातील ९० टक्‍के कुटुंबे लाकडी सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्‍वसनाचे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्‍के कुटुंबांकडे गॅस आहेत ; मात्र स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक 'बजेट' कोलमडले आहे. यातच पगारदार, व्यावसायिकही आता चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

२०२० मध्ये ५९९.५५ तर आता ८२७ रुपयांवर

उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅसजोड मोफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याने खुल्या बाजारातील दराप्रमाणे सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारी२०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहोचले, त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९.५०, तर मार्च २०२१ मध्येही गॅस सिलिंडरची भाववाढ होऊन सिलिंडर ८२७ रुपयांवर पोहोचला आहे.

९७० ग्राहकांनी फिरवली पाठ

केंद्र सरकारच्या 'उज्ज्वला योजनेंतर्गत' मागील दोन-तीन वर्षामध्ये पुरंदर मधील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत २,५३९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन मोफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत २,५३९ गॅस जोड लाभार्थी असले तरी, यामधील ९७० उज्ज्वल योजनेंतर्गत असलेले लाभार्थी सिलिंडर महाग आणि इतर काही कारणाने सिलिंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलिंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत आहे. अशी माहिती यशोधन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक अश्‍विनी वाघोले यांनी सांगितले.

कोट (१)

"उज्ज्वला योजनेंतर्गंत आम्हाला यशोधन गॅस एजन्सीमधून, मागील दोन वर्षांपूर्वी गॅसजोड मोफत मिळाले. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाल्याने आनंद झाला होता; मात्र महागडा सिलिंडर घेऊन वापरणे आता परवडत नाही.

आम्ही दिवसभर उन्हा-ताणात राबल्यावर १५० रुपये मजुरी मिळते आणि त्या सिलिंडरच्या मड्यावर कुठून ८०० रुपये खर्च करायचा. आम्ही मग खायचं काय? त्यामुळे बिनखर्चिक आपली चुलच बरी."

- छाया जगताप, कष्टकरी गृहिणी

"कोरोना आल्यापासून, सगळ्याच वस्तू महागल्यात. कोरोना यायच्या आधी तेलाचे पाकीट ७५ रुपयाला मिळायचे, आता १४४ रुपायाला झालं. गॅस सिलिंडर मिळत होता ५०० रुपयाला आता ८०० च्यावर गेला. पंतप्रधान मोदींनी फुकट गॅस कनेक्शन दिलं; पण आता सिलिंडर महाग करून ठेवलाय, घरं खर्च भागविताना नाकीनऊ येतंय, त्यामुळे आम्ही आता सिलिंडर भरून आणला नाय. आता चुलीवर स्वयंपाक करतेय."

- अलका चव्हाण,

चुलीवर स्वयंपाक करताना महिला.