शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

ग्रामीण भागात आता पुन्हा पेटू लागल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी ...

गृहिणींचे आर्थिक 'बजेट' कोलमडले

नीरा : दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले; मात्र गत काही महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, तसेच सबसिडीही बंद झाल्याने, उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असून धुरामुळे त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसू आले आहेत.

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता सिलिंडर महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने, आर्थिक संकट गडद होत असून, परिणामी घरोघरी वापर असलेला गॅस भरून आणण्यासाठी पैसे नसल्याने, ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी वर्ग पुन्हा चुलीकडे वळाला आहे.

ग्रामीण भागातील ९० टक्‍के कुटुंबे लाकडी सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्‍वसनाचे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्‍के कुटुंबांकडे गॅस आहेत ; मात्र स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक 'बजेट' कोलमडले आहे. यातच पगारदार, व्यावसायिकही आता चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

२०२० मध्ये ५९९.५५ तर आता ८२७ रुपयांवर

उज्ज्वला योजनेंतर्गंत गॅसजोड मोफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याने खुल्या बाजारातील दराप्रमाणे सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी जानेवारी२०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहोचले, त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९.५०, तर मार्च २०२१ मध्येही गॅस सिलिंडरची भाववाढ होऊन सिलिंडर ८२७ रुपयांवर पोहोचला आहे.

९७० ग्राहकांनी फिरवली पाठ

केंद्र सरकारच्या 'उज्ज्वला योजनेंतर्गत' मागील दोन-तीन वर्षामध्ये पुरंदर मधील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत २,५३९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन मोफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत २,५३९ गॅस जोड लाभार्थी असले तरी, यामधील ९७० उज्ज्वल योजनेंतर्गत असलेले लाभार्थी सिलिंडर महाग आणि इतर काही कारणाने सिलिंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलिंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत आहे. अशी माहिती यशोधन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक अश्‍विनी वाघोले यांनी सांगितले.

कोट (१)

"उज्ज्वला योजनेंतर्गंत आम्हाला यशोधन गॅस एजन्सीमधून, मागील दोन वर्षांपूर्वी गॅसजोड मोफत मिळाले. उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाल्याने आनंद झाला होता; मात्र महागडा सिलिंडर घेऊन वापरणे आता परवडत नाही.

आम्ही दिवसभर उन्हा-ताणात राबल्यावर १५० रुपये मजुरी मिळते आणि त्या सिलिंडरच्या मड्यावर कुठून ८०० रुपये खर्च करायचा. आम्ही मग खायचं काय? त्यामुळे बिनखर्चिक आपली चुलच बरी."

- छाया जगताप, कष्टकरी गृहिणी

"कोरोना आल्यापासून, सगळ्याच वस्तू महागल्यात. कोरोना यायच्या आधी तेलाचे पाकीट ७५ रुपयाला मिळायचे, आता १४४ रुपायाला झालं. गॅस सिलिंडर मिळत होता ५०० रुपयाला आता ८०० च्यावर गेला. पंतप्रधान मोदींनी फुकट गॅस कनेक्शन दिलं; पण आता सिलिंडर महाग करून ठेवलाय, घरं खर्च भागविताना नाकीनऊ येतंय, त्यामुळे आम्ही आता सिलिंडर भरून आणला नाय. आता चुलीवर स्वयंपाक करतेय."

- अलका चव्हाण,

चुलीवर स्वयंपाक करताना महिला.