शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार २० हजार

By admin | Updated: March 10, 2016 00:49 IST

येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे

सासवड : येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर, एका महिलेने पैसे देत नाहीत म्हणून कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली होती, तर याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्धा झाल्यानंतर खळबळ उडाली होती . त्यानंतर पैसे देण्याचे खात्रीशीर जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेऊन दि. ८ मार्च रोजी पुन्हा बँकेत ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज (दि. ८) पुन्हा तालुक्यातील खातेदार व ठेवीदार यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे मागणे मांडले. तसेच, पैसे देण्याचे जाहीर केल्याशिवाय इथून हटणार नाही, असा निर्धार केला. मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्यासह रुपी बचाव पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते, दिलीप सातरीकर, सुधीर गोरीवले, तुकाराम कदम, पुरंदर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी जगताप, खातेदारांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच, विविध प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही बँकेत ठेवलेले पैसे आमच्या हक्काचे आहेत, आम्ही तुमच्याकडे कर्ज मागायला नाही आलो. तुम्ही कर्जदारांकडून वसुली करा, नाही तर नका करू, आम्हाला काही देणे-घेणे नाही, मात्र आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. असा पवित्रा घेत आज पुन्हा खातेदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.मागील मिटिंग झाल्यानंतर बँकेने कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केली आहे. केवळ आठ दिवसांत ७ लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. तसेच, मार्चअखेरपर्यंत आणखी ४० लाख रुपये वसूल करण्यात येतील. कर्जदारांचे न्यायालयात खटले सुरू असून, ते जलद निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. २०१३ मध्ये ९ कोटी रुपयांचे कर्ज होते, आता ते १ कोटी रुपयावर आले आहे. त्यामुळे ते लवकर वसूल करण्यात येतील. - व्ही. व्ही. बहुलेकर, शाखा अधिकारी, सासवड> अर्ज भरून घेणार : अभ्यंकर मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी बँकेचे प्रशासक अभ्यंकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, त्यांनी एक एप्रिलपासून प्रत्येक खातेदाराला २० हजार रुपये देण्यात येतील, असे सांगितले. पुढील काळात ५० हजार रुपये मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरूअसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे याबाबत असे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, ठेवीदारांनी आपले अर्ज भरून द्यावेत आलेल्या एकूण अर्जांपैकी एका वेळेस १०० अर्ज भरून पाठविले जातील, तसेच त्यानंतर पुढील १०० अर्ज पाठविले जातील याप्रमाणे ठेवीदारांना पैशांचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.