शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार २० हजार

By admin | Updated: March 10, 2016 00:49 IST

येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे

सासवड : येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर, एका महिलेने पैसे देत नाहीत म्हणून कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली होती, तर याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्धा झाल्यानंतर खळबळ उडाली होती . त्यानंतर पैसे देण्याचे खात्रीशीर जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेऊन दि. ८ मार्च रोजी पुन्हा बँकेत ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज (दि. ८) पुन्हा तालुक्यातील खातेदार व ठेवीदार यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे मागणे मांडले. तसेच, पैसे देण्याचे जाहीर केल्याशिवाय इथून हटणार नाही, असा निर्धार केला. मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्यासह रुपी बचाव पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते, दिलीप सातरीकर, सुधीर गोरीवले, तुकाराम कदम, पुरंदर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी जगताप, खातेदारांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच, विविध प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही बँकेत ठेवलेले पैसे आमच्या हक्काचे आहेत, आम्ही तुमच्याकडे कर्ज मागायला नाही आलो. तुम्ही कर्जदारांकडून वसुली करा, नाही तर नका करू, आम्हाला काही देणे-घेणे नाही, मात्र आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. असा पवित्रा घेत आज पुन्हा खातेदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.मागील मिटिंग झाल्यानंतर बँकेने कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केली आहे. केवळ आठ दिवसांत ७ लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. तसेच, मार्चअखेरपर्यंत आणखी ४० लाख रुपये वसूल करण्यात येतील. कर्जदारांचे न्यायालयात खटले सुरू असून, ते जलद निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. २०१३ मध्ये ९ कोटी रुपयांचे कर्ज होते, आता ते १ कोटी रुपयावर आले आहे. त्यामुळे ते लवकर वसूल करण्यात येतील. - व्ही. व्ही. बहुलेकर, शाखा अधिकारी, सासवड> अर्ज भरून घेणार : अभ्यंकर मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी बँकेचे प्रशासक अभ्यंकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, त्यांनी एक एप्रिलपासून प्रत्येक खातेदाराला २० हजार रुपये देण्यात येतील, असे सांगितले. पुढील काळात ५० हजार रुपये मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरूअसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे याबाबत असे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, ठेवीदारांनी आपले अर्ज भरून द्यावेत आलेल्या एकूण अर्जांपैकी एका वेळेस १०० अर्ज भरून पाठविले जातील, तसेच त्यानंतर पुढील १०० अर्ज पाठविले जातील याप्रमाणे ठेवीदारांना पैशांचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.