शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार २० हजार

By admin | Updated: March 10, 2016 00:49 IST

येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे

सासवड : येथील रुपी बँकेत खातेदारांनी पैसे परत मिळावेत, यासाठी आंदोलनाचा मार्ग बँकेच्या अवलंबला आहे. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर, एका महिलेने पैसे देत नाहीत म्हणून कंटाळून विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने बँकेच्या व्यवस्थापनाची पळापळ झाली होती, तर याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्धा झाल्यानंतर खळबळ उडाली होती . त्यानंतर पैसे देण्याचे खात्रीशीर जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेऊन दि. ८ मार्च रोजी पुन्हा बँकेत ठिय्या मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज (दि. ८) पुन्हा तालुक्यातील खातेदार व ठेवीदार यांनी बँकेच्या व्यवस्थापनाकडे मागणे मांडले. तसेच, पैसे देण्याचे जाहीर केल्याशिवाय इथून हटणार नाही, असा निर्धार केला. मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्यासह रुपी बचाव पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते, दिलीप सातरीकर, सुधीर गोरीवले, तुकाराम कदम, पुरंदर कृती समितीचे अध्यक्ष संभाजी जगताप, खातेदारांनी बँकेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच, विविध प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही बँकेत ठेवलेले पैसे आमच्या हक्काचे आहेत, आम्ही तुमच्याकडे कर्ज मागायला नाही आलो. तुम्ही कर्जदारांकडून वसुली करा, नाही तर नका करू, आम्हाला काही देणे-घेणे नाही, मात्र आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. असा पवित्रा घेत आज पुन्हा खातेदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.मागील मिटिंग झाल्यानंतर बँकेने कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू केली आहे. केवळ आठ दिवसांत ७ लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. तसेच, मार्चअखेरपर्यंत आणखी ४० लाख रुपये वसूल करण्यात येतील. कर्जदारांचे न्यायालयात खटले सुरू असून, ते जलद निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. २०१३ मध्ये ९ कोटी रुपयांचे कर्ज होते, आता ते १ कोटी रुपयावर आले आहे. त्यामुळे ते लवकर वसूल करण्यात येतील. - व्ही. व्ही. बहुलेकर, शाखा अधिकारी, सासवड> अर्ज भरून घेणार : अभ्यंकर मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी बँकेचे प्रशासक अभ्यंकर यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता, त्यांनी एक एप्रिलपासून प्रत्येक खातेदाराला २० हजार रुपये देण्यात येतील, असे सांगितले. पुढील काळात ५० हजार रुपये मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरूअसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे याबाबत असे अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, ठेवीदारांनी आपले अर्ज भरून द्यावेत आलेल्या एकूण अर्जांपैकी एका वेळेस १०० अर्ज भरून पाठविले जातील, तसेच त्यानंतर पुढील १०० अर्ज पाठविले जातील याप्रमाणे ठेवीदारांना पैशांचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.