शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रम्बलर्सने वाढतेय धडधड

By admin | Updated: April 10, 2017 02:54 IST

स्थानिक नागरिकांच्या मागणीतून एका रात्रीत तयार होणाऱ्या रस्त्यांवरील रम्बलर्सची वाढती संख्या

 पुणे : स्थानिक नागरिकांच्या मागणीतून एका रात्रीत तयार होणाऱ्या रस्त्यांवरील रम्बलर्सची वाढती संख्या त्या रस्त्यांवरून रोज जाणा-येणाऱ्या वाहनचालकांच्या त्रासाचे कारण होत आहे. रम्बलर्स काढून टाकण्याची त्यांची मागणी, ते राहू द्यावेत यासाठी आग्रही असलेले स्थानिक नागरिक व त्यांच्या मागे असलेले माननीय यातून करायचे काय, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.दत्तवाडी परिसरातील गतिरोधकांच्या (सिमेंटचे तसेच नव्याने निघालेले प्लॅस्टिकचे) तसेच रम्बलर्स (रस्त्यापेक्षा अगदी थोड्या उंचीवर असणाऱ्या रंगांच्या सलग ५ ते ७ पट्ट्या) संख्येबद्दल सातत्याने  तक्रार करण्यात येते. या वाढत्या संख्येतील त्या भागातील घरांची रचना कारणीभूत आहे. रस्त्याला अगदी लागून घरे आहेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती घरातून बाहेर सातत्याने येत जात असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांची त्यांना धडक बसू शकते. असे होऊ नये, वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी या भागातील नागरिकांकडून रम्बलर्स किंवा गतिरोधक बसवण्याची मागणी केली जाते. नगरसेवकांकडे झालेली ही मागणी मतदारांची असल्यामुळे त्वरित पूर्ण केली जाते. त्यामुळे या रस्त्यावर अगदी ५० फूट अंतरावरसुद्धा असे गतिरोधक किंवा रम्बलर्स बसवले गेले आहेत. ती त्या त्या भागाची गरज आहे, ती लक्षात घेऊनच महापालिका किंवा वाहतूक शाखेकडून बसवले जातात. त्यांची संख्या आता वाढल्यामुळे वाहनचालकांना त्या रस्त्यावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातही दुचाकी वाहने तर खडखड करत पुढे जातात. त्यातून अनेकांना पाठीचे, मानेचे, कंबरेचे विकार जडले आहेत. रम्बलर्स रस्त्यावर लगेच दिसत नाहीत. त्यामुळे वाहनाचा वेग कमी झाला नसेल तर हा त्रास अधिकच वाढतो. कमी केला तर गाडीचे शॉक अ‍ॅब्झॉर्बर खराब होतात. अनेकांची वाहने नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे वाहनचालकांकडून गतिरोधक काढून टाकावेत अशी मागणी सातत्याने होत असते. ते ऐकून महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी गेले की स्थानिक नागरिकांकडून त्यांना विरोध केला जातो. नगरसेवकांकडे तक्रार केली जाते. माननीय लगेच तिथे हजर होतात व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. अशा प्रकारांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिकेच्या पथ विभागातील अभियंते, वरिष्ठ अधिकारीही आता वैतागून गेले आहेत. त्यातूनच याविषयाचा विचार करण्यासाठी लवकरच वाहतूक शाखा, काही नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी यांच्या बैठकीचा विचार आहे. शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य ठिकाणी अशीच स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत तर नगरसेवक गतिरोधक, रम्बलर्स किंवा स्टिल पोलॉर्ड याकडे आपल्या प्रभाग विकास निधीतील खर्चाचा एक अत्यावश्यक भाग म्हणूनच पाहत आहेत. त्यामुळेच शहरातील बहुतेक रस्त्यांवर ते बसवले गेले आहेत. काही ठिकाणी तर रस्ता कमी व गतिरोधक जास्त अशी स्थिती झाली आहे. शहरातंर्गत रस्त्यांची अवस्था आधीच नाजूक असते. ते ठिकठिकाणी खोदून ठेवलेले असतात. त्यात आता गतिरोधकांची भर पडली आहे. त्यामुळे हे रस्ते म्हणजे अडथळ्यांची शर्यत झाले आहेत.कोणत्या रस्त्यावर किती गतिरोधक, रम्बलर्स असावेत, दोन गतिरोधकांमधील अंतर किती असावे याबाबत महापालिकेत काही धोरणच नाही. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, पादचाऱ्यांचा वापर असा बारकाईने विचार होण्याची यात गरज आहे, पण महापालिकेच्या ते गावीही नाही. इतकेच काय, पण वाहतूक शाखा व महापालिका यांच्यातच याबाबत कसला समन्वय नाही.स्थानिक नागरिक व त्या रस्त्याचा वापर करणारे वाहनचालक अशा दोन्ही बाजूंनी याबाबत तक्रारी येत आहेत हे खरे आहे. त्यामुळेच याबाबत आता विचार करावा लागणार आहे. सर्व घटकांशी संपर्क साधून यावर उपाययोजना केली जाईल.- राजेंद्र राऊत, मुख्य अभियंता, पथविभाग, महापालिका