शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भीमा नदीपात्रात खडखडाट!

By admin | Updated: March 30, 2017 00:26 IST

चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी

दावडी: चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी ठणठणीत पडली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हा प्रश्न उद्भवला असून शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्यानेचासकमान धरणातून थोडे तरी पाणीसोडावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून भीमानदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच मार्च महिन्यात नदी कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग तसेच तरकारी पिके घेतली आहेत. उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. मात्र या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे रोज या बंधाऱ्यांतून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे नदीपात्रात अडविलेल्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, त्यामुळे कृषिपंप मोकळे पडले आहेत. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडी, पिंपळ, मलघेवाडी, शिरोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.चासकमान धरणात सध्या36.81% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून एक ४० दिवसांचे डाव्या कालव्याला पाणीवाटप बैठकीत ठरल्यामुळे पाण्याचे आवर्तन बाकी आहे. मात्र पाणी कालव्याला कधी सोडणार, हे अद्याप निश्चित नाही.रब्बी पिकासाठी साडलेले पाण्याचे आवर्तन खेड व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज नसतानाही दोन महिने डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. तेच पाण्याचे आवर्तन २५ दिवसांचे केले असते तर धरणात अजून जादा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळ्याचे दोन महिने या पाण्याचा उपयोग झाला असता. मात्र पाण्याचे वाटप नियोजन योग्य नाही, असे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शिरोली, मांजरेवाडी, पिंपळ, होलेवाडी या परिसरातील शेतकरी पाणी नसल्यामुळे अडचणीत, तसेच दावडी, निमगाव, खरपुडी, टाकळकरवाडी, जऊळके, मांडवळा या परिसरातील कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके धोक्यात.