शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीपात्रात खडखडाट!

By admin | Updated: March 30, 2017 00:26 IST

चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी

दावडी: चासकमान धरण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणारी भीमानदी कोरडी ठणठणीत पडली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हा प्रश्न उद्भवला असून शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असल्यानेचासकमान धरणातून थोडे तरी पाणीसोडावे,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म), मलघेवाडी, शिरोली, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून भीमानदी वाहते. गेल्या दहा वर्षांत प्रथमच मार्च महिन्यात नदी कोरडी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. वीजपंप मोकळे पडले आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग तसेच तरकारी पिके घेतली आहेत. उन्हाचा तडाखा असल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. नदीला पाणीच नसल्यामुळे पिके जळून गेली आहेत. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतील पाण्यांनी तळ गाठला आहे. खरपुडी येथील बंधाऱ्यात पाणी अडविण्यात येते. मात्र या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे रोज या बंधाऱ्यांतून लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे नदीपात्रात अडविलेल्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, त्यामुळे कृषिपंप मोकळे पडले आहेत. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भीमा नदीत चासकमान धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी मांजरेवाडी, पिंपळ, मलघेवाडी, शिरोली येथील शेतकऱ्यांनी केली आहे.चासकमान धरणात सध्या36.81% पाणीसाठा शिल्लक आहे. अजून एक ४० दिवसांचे डाव्या कालव्याला पाणीवाटप बैठकीत ठरल्यामुळे पाण्याचे आवर्तन बाकी आहे. मात्र पाणी कालव्याला कधी सोडणार, हे अद्याप निश्चित नाही.रब्बी पिकासाठी साडलेले पाण्याचे आवर्तन खेड व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज नसतानाही दोन महिने डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. तेच पाण्याचे आवर्तन २५ दिवसांचे केले असते तर धरणात अजून जादा प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळ्याचे दोन महिने या पाण्याचा उपयोग झाला असता. मात्र पाण्याचे वाटप नियोजन योग्य नाही, असे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शिरोली, मांजरेवाडी, पिंपळ, होलेवाडी या परिसरातील शेतकरी पाणी नसल्यामुळे अडचणीत, तसेच दावडी, निमगाव, खरपुडी, टाकळकरवाडी, जऊळके, मांडवळा या परिसरातील कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेली उन्हाळी पिके धोक्यात.