शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांची ऐशीतैशी; ना मास्क, ना सॅनिटायझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST

प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खासगी ट्रॅव्हल्स ...

प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खासगी ट्रॅव्हल्स सेवा पुण्याहून राज्यातील विविध शहरांसाठी सुरू आहे. पण ही सेवा कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. ना प्रवाशांकडून नियमांचे पालन होत आहे, ना ट्रॅव्हल्स सेवा देणाऱ्या कंपनीकडून. काही प्रवासी मास्क लावतात, तर काही लावत नाहीत. काही गाडीत सॅनिटायझरची सोयही नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास तसेच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना या बाबी तपासल्या जात नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर कडक निर्बंध आणले. मात्र याची अंमलबजावणी ट्रॅव्हल्स चालकांकडून होत नाही. पुण्याहून मुंबई, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आदी शहरांसाठी वाहतूक सुरू आहे. सध्या केवळ अत्यावश्यक कारणासाठीच एसटीची मर्यादित वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीऐवजी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. या बदल्यात एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत जवळपास दोनशे ते तीनशे रुपये जास्त दिले जात आहेत.

----------------

५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी :

ट्रॅव्हल्सची आसनक्षमता ४५ इतकी आहे. शासनाच्या नियमानुसार गाडीत २२ प्रवासी म्हणजेच ५० टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र काही मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये २२ पेक्षा जास्त प्रवासी घेतात. गाडी पुण्यातून बाहेर पडल्यानंतर मार्गावरील छोट्या थांब्यावरच्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जातो. अशा टप्पा वाहतुकीसाठी केवळ एसटीलाच परवानगी आहे.

----------------

ना ऑक्सिजन, ना शरीराचे तापमान तपासतात

प्रवासी गाडीत चढत असताना त्याची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान तपासले गेले पाहिजे. मात्र अशी कोणतीच व्यवस्था गाडीत दिसून आली नाही. तसेच अनेक प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हते. गाडीचे चालक अन्य कर्मचारी देखील विनामास्कच होते. त्यामुळेच मास्क बाबतीत प्रवाशांना सूचना देण्याचा प्रश्नच उरत नाही.

----------------------

ई-पास नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पोलीस आयुक्तालय अथवा ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा पास असणे अनिवार्य आहे. मात्र ट्रॅव्हल्सचे प्रवासी ई-पास न घेताच प्रवास करीत आहेत. चेकपोस्टवर गाडी थांबल्यावर पोलिसाकडून कोणतीही कागदपत्रे पाहिली जात नाहीत.

-----------------

आरटीओची सोयीने कारवाई :

परिवहन आयुक्त यांचा आदेश आल्यावर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे आरटीओची ४४ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई झाली. नंतर मात्र कोणतेही कारवाई झाली नाही. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरू आहे का? असा प्रतिप्रश्न सुरू उपस्थित करून याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले.

शहरात रोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स येतात आणि जातात. यातून १००० ते १५०० प्रवाशांची वाहतूक होत आहे.