शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये नियमांची ऐशीतैशी; ना मास्क, ना सॅनिटायझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST

प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खासगी ट्रॅव्हल्स ...

प्रवाशांकडे ना कोरोना चाचणीचा रिपोर्ट ना प्रवासासाठी ई-पास, ५० टक्क्यांपेक्षाही जास्त उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खासगी ट्रॅव्हल्स सेवा पुण्याहून राज्यातील विविध शहरांसाठी सुरू आहे. पण ही सेवा कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. ना प्रवाशांकडून नियमांचे पालन होत आहे, ना ट्रॅव्हल्स सेवा देणाऱ्या कंपनीकडून. काही प्रवासी मास्क लावतात, तर काही लावत नाहीत. काही गाडीत सॅनिटायझरची सोयही नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास तसेच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना या बाबी तपासल्या जात नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर कडक निर्बंध आणले. मात्र याची अंमलबजावणी ट्रॅव्हल्स चालकांकडून होत नाही. पुण्याहून मुंबई, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आदी शहरांसाठी वाहतूक सुरू आहे. सध्या केवळ अत्यावश्यक कारणासाठीच एसटीची मर्यादित वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीऐवजी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडत आहेत. या बदल्यात एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत जवळपास दोनशे ते तीनशे रुपये जास्त दिले जात आहेत.

----------------

५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी :

ट्रॅव्हल्सची आसनक्षमता ४५ इतकी आहे. शासनाच्या नियमानुसार गाडीत २२ प्रवासी म्हणजेच ५० टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र काही मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये २२ पेक्षा जास्त प्रवासी घेतात. गाडी पुण्यातून बाहेर पडल्यानंतर मार्गावरील छोट्या थांब्यावरच्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जातो. अशा टप्पा वाहतुकीसाठी केवळ एसटीलाच परवानगी आहे.

----------------

ना ऑक्सिजन, ना शरीराचे तापमान तपासतात

प्रवासी गाडीत चढत असताना त्याची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान तपासले गेले पाहिजे. मात्र अशी कोणतीच व्यवस्था गाडीत दिसून आली नाही. तसेच अनेक प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हते. गाडीचे चालक अन्य कर्मचारी देखील विनामास्कच होते. त्यामुळेच मास्क बाबतीत प्रवाशांना सूचना देण्याचा प्रश्नच उरत नाही.

----------------------

ई-पास नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पोलीस आयुक्तालय अथवा ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा पास असणे अनिवार्य आहे. मात्र ट्रॅव्हल्सचे प्रवासी ई-पास न घेताच प्रवास करीत आहेत. चेकपोस्टवर गाडी थांबल्यावर पोलिसाकडून कोणतीही कागदपत्रे पाहिली जात नाहीत.

-----------------

आरटीओची सोयीने कारवाई :

परिवहन आयुक्त यांचा आदेश आल्यावर ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे आरटीओची ४४ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई झाली. नंतर मात्र कोणतेही कारवाई झाली नाही. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरू आहे का? असा प्रतिप्रश्न सुरू उपस्थित करून याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले.

शहरात रोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स येतात आणि जातात. यातून १००० ते १५०० प्रवाशांची वाहतूक होत आहे.