शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

By admin | Updated: June 29, 2017 03:43 IST

विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा म्हणून टिकास्त्र सोडले व त्यात सत्ताधारी अगदी अलगद सापडले. त्यामुळेच सहज सुटू शकणारा विषय त्यांच्यासाठी आता जटील झाला असून तो सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे महापालिकेत बोलले जात आहे.पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऐन शाळा सुरू व्हायच्या वेळेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दर प्रतिकिलोमीटर ६१ रुपयांवरून १४१ रुपये केले. त्याची पूर्वकल्पना शाळांना, संचालक मंडळाला दिलीच नाही. एकूण ६७ बस या प्रकारे सुरू होत्या. त्यातील ११ शाळांच्या १७ बस वगळता अन्य शाळांनी वाढीव दराने बस घेतल्या. काही शाळा महापालिकेच्या होत्या, त्या विनामूल्यच असल्याने त्याही सुरूच राहिल्या. प्रश्न फक्त ११ शाळांच्या १७ बसचाच शिल्लक राहिला आहे, असे पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यातही पीएमपीएलच्या वतीने सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो. हे ७५ टक्के महापालिका पीएमपीला देत असते. तरीही काही खासगी शाळांनी आमचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे आम्हाला खास बस हवी, अशी मागणी केली होती. ती महापालिकेने मान्य केली. एका बसमध्ये किमान ४५ विद्यार्थी असतील तर ती बस पीएमपीएलला परवडते, मात्र गेल्या वर्षभरात एका बसमध्ये फक्त २० ते २५ किंवा फारतर २८ विद्यार्थीच येऊ लागले. त्यामुळे ती बस पीएमपीला परवडेनाशी झाली. त्यातूनच मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय घेतला, असे अधिकारी सांगतात. दरम्यानच्या काळात डिझेल व सुटे भाग महागल्यामुळे प्रतिकिलोमीटर दरही ६१ रुपयांहून ८१ रुपये करण्यात आला होता व त्याप्रमाणेच आकारणी सुरू होती. आता पुन्हा तोटा वाढू लागल्यानंतर मुंढे यांनी ही दरवाढ केली. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत दिली जात असताना व ते पैसे महापालिका अदा करत असताना पुन्हा खास बस कशासाठी या विचाराने त्यांनी नव्याने झालेल्या या दरवाढीबाबत काही शाळांनी दरवाढीबाबत ओरडा सुरू केल्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून दरवाढीचा विषय लावून धरला, त्यामुळे भाजपाला यावर हालचाल करणे भाग पडले व ते त्यातून ते अडचणीत आले आहेत, असेच दिसते आहे.