शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

By admin | Updated: June 29, 2017 03:43 IST

विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा म्हणून टिकास्त्र सोडले व त्यात सत्ताधारी अगदी अलगद सापडले. त्यामुळेच सहज सुटू शकणारा विषय त्यांच्यासाठी आता जटील झाला असून तो सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे महापालिकेत बोलले जात आहे.पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऐन शाळा सुरू व्हायच्या वेळेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दर प्रतिकिलोमीटर ६१ रुपयांवरून १४१ रुपये केले. त्याची पूर्वकल्पना शाळांना, संचालक मंडळाला दिलीच नाही. एकूण ६७ बस या प्रकारे सुरू होत्या. त्यातील ११ शाळांच्या १७ बस वगळता अन्य शाळांनी वाढीव दराने बस घेतल्या. काही शाळा महापालिकेच्या होत्या, त्या विनामूल्यच असल्याने त्याही सुरूच राहिल्या. प्रश्न फक्त ११ शाळांच्या १७ बसचाच शिल्लक राहिला आहे, असे पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यातही पीएमपीएलच्या वतीने सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो. हे ७५ टक्के महापालिका पीएमपीला देत असते. तरीही काही खासगी शाळांनी आमचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे आम्हाला खास बस हवी, अशी मागणी केली होती. ती महापालिकेने मान्य केली. एका बसमध्ये किमान ४५ विद्यार्थी असतील तर ती बस पीएमपीएलला परवडते, मात्र गेल्या वर्षभरात एका बसमध्ये फक्त २० ते २५ किंवा फारतर २८ विद्यार्थीच येऊ लागले. त्यामुळे ती बस पीएमपीला परवडेनाशी झाली. त्यातूनच मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय घेतला, असे अधिकारी सांगतात. दरम्यानच्या काळात डिझेल व सुटे भाग महागल्यामुळे प्रतिकिलोमीटर दरही ६१ रुपयांहून ८१ रुपये करण्यात आला होता व त्याप्रमाणेच आकारणी सुरू होती. आता पुन्हा तोटा वाढू लागल्यानंतर मुंढे यांनी ही दरवाढ केली. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत दिली जात असताना व ते पैसे महापालिका अदा करत असताना पुन्हा खास बस कशासाठी या विचाराने त्यांनी नव्याने झालेल्या या दरवाढीबाबत काही शाळांनी दरवाढीबाबत ओरडा सुरू केल्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून दरवाढीचा विषय लावून धरला, त्यामुळे भाजपाला यावर हालचाल करणे भाग पडले व ते त्यातून ते अडचणीत आले आहेत, असेच दिसते आहे.