शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

विरोधकांच्या राजकीय जाळ्यात सापडले सत्ताधारी

By admin | Updated: June 29, 2017 03:43 IST

विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांच्या बसमध्ये भाडेवाढ करण्याचा विषय नक्की काय आहे, हे समजून न घेताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचा म्हणून टिकास्त्र सोडले व त्यात सत्ताधारी अगदी अलगद सापडले. त्यामुळेच सहज सुटू शकणारा विषय त्यांच्यासाठी आता जटील झाला असून तो सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे महापालिकेत बोलले जात आहे.पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी ऐन शाळा सुरू व्हायच्या वेळेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे दर प्रतिकिलोमीटर ६१ रुपयांवरून १४१ रुपये केले. त्याची पूर्वकल्पना शाळांना, संचालक मंडळाला दिलीच नाही. एकूण ६७ बस या प्रकारे सुरू होत्या. त्यातील ११ शाळांच्या १७ बस वगळता अन्य शाळांनी वाढीव दराने बस घेतल्या. काही शाळा महापालिकेच्या होत्या, त्या विनामूल्यच असल्याने त्याही सुरूच राहिल्या. प्रश्न फक्त ११ शाळांच्या १७ बसचाच शिल्लक राहिला आहे, असे पीएमपीमधील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यातही पीएमपीएलच्या वतीने सर्वच शालेय विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के सवलतीच्या दरात पास दिला जातो. हे ७५ टक्के महापालिका पीएमपीला देत असते. तरीही काही खासगी शाळांनी आमचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे आम्हाला खास बस हवी, अशी मागणी केली होती. ती महापालिकेने मान्य केली. एका बसमध्ये किमान ४५ विद्यार्थी असतील तर ती बस पीएमपीएलला परवडते, मात्र गेल्या वर्षभरात एका बसमध्ये फक्त २० ते २५ किंवा फारतर २८ विद्यार्थीच येऊ लागले. त्यामुळे ती बस पीएमपीला परवडेनाशी झाली. त्यातूनच मुंढे यांनी दरवाढीचा निर्णय घेतला, असे अधिकारी सांगतात. दरम्यानच्या काळात डिझेल व सुटे भाग महागल्यामुळे प्रतिकिलोमीटर दरही ६१ रुपयांहून ८१ रुपये करण्यात आला होता व त्याप्रमाणेच आकारणी सुरू होती. आता पुन्हा तोटा वाढू लागल्यानंतर मुंढे यांनी ही दरवाढ केली. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ७५ टक्के सवलत दिली जात असताना व ते पैसे महापालिका अदा करत असताना पुन्हा खास बस कशासाठी या विचाराने त्यांनी नव्याने झालेल्या या दरवाढीबाबत काही शाळांनी दरवाढीबाबत ओरडा सुरू केल्यानंतर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी म्हणून दरवाढीचा विषय लावून धरला, त्यामुळे भाजपाला यावर हालचाल करणे भाग पडले व ते त्यातून ते अडचणीत आले आहेत, असेच दिसते आहे.