शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

मोजक्याच शाळांकडून आरटीई प्रवेशास नकार

By admin | Updated: September 14, 2015 04:47 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सर्व शाळांनी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गात प्रवेश देणे आवश्यक आहे

पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर सर्व शाळांनी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गात प्रवेश देणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील काही नामांकित शाळांकडूनच गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाळा सुरू केल्या की नफेखोरी करण्यासाठी सुरू केल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.न्यायालयाच्या आदेशामुळे सर्व शाळांना आरटीई प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही शहरातील शाळांनी प्रवेशास नकार दिला आहे. त्यावर शिक्षण विभागाने कारवाई म्हणून संबंधित शाळांवर गुन्हे दाखल केले. शिक्षण विभागाकडून होत असलेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी काही संस्थाचालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. संस्थाचालकांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाच्या निर्णयात नेमके काय म्हटले आहे, हे विधी व न्याय विभागाकडून येत्या दोन दिवसांत जाणून घेतले जाईल. त्यानंतर प्रवेश दिले जातील, असे तावडे यांनी स्पष्ट केले. मात्र, १५ दिवस होऊन गेले तरी विधी व न्याय विभागाकडून कोणतेही उत्तर आले नाही. परंतु, न्यायालयाच्या आदेशापुढे काहीही होऊ शकत नाही, हे माहीत असल्याने सिम्बायोसिस, ज्ञानगंगा, ट्री हाऊस, दिल्ली पब्लिक स्कूल, बाल शिक्षण आदी शाळांनी कोणतेही आढेवेढे न घेता आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. तसेच काही शाळांनी पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश दिला; मात्र, पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यास नकार देत आहेत.(प्रतिनिधी)