शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कागदावर उड्डाणे कोटीची; सायकल ट्रॅक नावालाच

By admin | Updated: December 4, 2015 02:49 IST

पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर बनविण्यासाठी महापालिका कोट्यवधीचा खर्च करीत आहे; मात्र त्यांचे नियोजित सायकल ट्रॅक रस्त्यावर प्रत्यक्षात यायला

पुणे : पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने पुण्याला पुन्हा एकदा सायकलींचे शहर बनविण्यासाठी महापालिका कोट्यवधीचा खर्च करीत आहे; मात्र त्यांचे नियोजित सायकल ट्रॅक रस्त्यावर प्रत्यक्षात यायला तयार नाहीत. आता तिसऱ्या वेळी या योजनेसाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली असून, तिला फक्त सल्ला देण्यासाठी सव्वा कोटी रुपये अदा केले जातील.वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन सायकलींचा वापर वाढावा, यासाठी सर्वप्रथम सन २००६मध्ये जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेतून पुण्यात सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. मुख्य रस्ता व पदपथ यांच्यामधून काही प्रमुख रस्त्यांवर असे ट्रॅक तयार झाले. मात्र, त्यांच्या वापराविषयी पालिकेकडून काहीही प्रचार करण्यात आला नाही.वापरच होत नसल्याने हे सगळे ट्रॅक खराब झाले व पूर्वीप्रमाणेच रस्त्याचा एक भाग होऊन गेले. दरम्यान महापालिकेने यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च केला होता.त्यानंतर पुन्हा सन २०१०मध्ये या योजनेचा विषय चर्चेत आला. विद्यमान उपमहापौर व तत्कालीन नगरसेवक आबा बागुल यांनी त्यासाठी एक प्रस्तावच तयार करून प्रशासनाला दिला. त्यानुसार शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर २५ सायकल स्टँड होते. पालिका ३०० सायकली घेणार होती. पहिले दोन तास विनामूल्य व नंतर प्रत्येक तासाला ५ रुपये प्रमाणे दर आकारून या सायकली भाडेतत्त्वावर देण्यात येणार होत्या. एका स्टँडवरून घेतलेली सायकल दुसऱ्या स्टँडवर सोडून देता येणार होती. खासगी वाहनांचा वापर कमी होईल, अशी या योजनेची रचना होती. निविदा जाहीर करून हे काम करून घेण्यात येणार होते.या योजनेला स्थायी समितीने व नंतर सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली. निविदाही जाहीर झाली. सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही, नंतर मात्र दोन जणांनी निविदा दाखल केल्या. त्यांतील एकाला मंजुरी देण्यात आली. त्यांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला. भूमिपूजनही झाले; मात्र नंतर प्रशासन व निविदाधारक यांच्यात वाद होऊन काम बंद पडले, ते पुन्हा सुरूच झाले नाही. (प्रतिनिधी)पुन्हा सल्लागार कंपनी का?आता सन २०१५मध्ये प्रशासनाने पुन्हा सायकल ट्रॅकची योजना पुढे आणली आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना सव्वा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या खर्चातून पूर्वीचीच योजना राबविता येईल; त्यासाठी सल्लागार कशाला हवा, असे बागुल यांचे म्हणणे आहे.