शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

पडकईसाठी ६३७.६३ लाख रुपये मंजूर

By admin | Updated: December 4, 2015 02:40 IST

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ या आदिवासी लोकसंख्या असलेल्या तालुक्यांमध्ये राबविल्या जात असलेल्या पडकई योजनेसाठी ६३७.६३ लाख रुपये केंद्रीय साह्य योजनेतून

घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ या आदिवासी लोकसंख्या असलेल्या तालुक्यांमध्ये राबविल्या जात असलेल्या पडकई योजनेसाठी ६३७.६३ लाख रुपये केंद्रीय साह्य योजनेतून मंजूर झाले आहेत. या रकमेतून प्रथम सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या कामांची बिले कृषी विभागाकडून अदा केली जाणार आहेत. पडकई पद्धतीला शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकरी करीत होते. शासनाने १ जुलै २००९ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसरात ४२ गावांत प्रायोगिक तत्त्वावर पडकई कार्यक्रम राबविण्यासाठी मंजुरी दिली. यासाठी ३८८४.०५ लाख रुपयांचा प्रकल्प अराखडा तयार करण्यात आला. शासनाने याला मंजुर देऊनही निधी दिला नव्हता. सन २०१० च्या हिवाळी अधिवेशनात याला निधी मिळाला. यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करून शासनाकडून पैसा उपलब्ध झाला. प्रायोगिक तत्त्वावर आंबेगाव तालुक्यातील पिंपरगणे, आहुपे, डोण, कोंढवळ, राजपूर या पाच गावांमधील ३७६ शेतकऱ्यांच्या ३९.७२ हेक्टर क्षेत्रावर पडकई राबविण्यासाठी ७८.१४ लक्ष रुपयांना मंजुरी मिळाली. जानेवारी २०११मध्ये ही कामे सुरू करण्यात आला. पडकई कार्यक्रमात त्या गावातील कुटुंबांनी मिळून प्रत्येकाची शेती दुरुस्त करायची व हे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाची किंमत संबंधित लाभार्थ्यांना चेकद्वारे कृषी विभागा देणार, शेतकऱ्यांचे दुरुस्त करायचे क्षेत्र त्या जमिनीच्या उतारावर ठरविले जाणार, ८ ते १२ टक्के उतार असलेल्या क्षेत्रासाठी १,८२,७७०, १२ ते १६ टक्के उतारासाठी २,१८,०९० व १६ ते २० टक्के उतारासाठी २,५२,३३० रुपये प्रतिहेक्टर मंजुरी देण्यात आली. जागा निवडणे, जमिनीचा उतार, रक्कम, काम झाल्यानंतर त्याचे बिल देण्याचे काम तालुका कृषी विभाग करणार, असे नियोजन होते. (वार्ताहर)आंबेगाव तालुक्यात ही योजना यशस्वी झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर व मावळ या आदिवासी जमाती असलेल्या तालुक्यांनी ही योजना राबवली जावी, अशी मागणी केली. शासनाने या तालुक्यांमध्येही कामे मंजूर केली व सन २०१४मध्ये या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली. मात्र, माळीण दुर्घटनेनंतर पडकई योजनेला निधी आला नाही तसेच नवीन कामांना मंजुरी मिळणे बंद झाले. मात्र, सन २०१४मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या कामांची बीले अडकली. आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ या तालुक्यांतील लोकप्रतिनिधी व शेतकरी सतत शासनाकडे केलेल्या कामांचे पैसे मिळावेत, यासाठी पाठपुरावा करत होते. शासनाने केंद्रीय साह्य योजनेअंतर्गत ६३७.६३ लाख रुपये मंजूर केले. यामधून प्रामुख्याने शेतकऱ्यांची अडकलेली बिले अदा केली जाणार आहेत. यामुळे आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ या तालुक्यांतील शेतकऱ्यांची जुनी बिले मिळणार आहेत. जुनी बिले देऊन शिल्लक रकमेतून नवीन कामे करण्याच्या विचारात कृषी विभाग आहे. मात्र, ही कामे करताना कोणतीही मशिनरी न लावता पूर्ण माणसांकडून केली जाणार आहे. जमिनीचा उतार व क्षेत्र ठरविण्यासाठी कडक नियम अवलंबले जाणार आहेत.