शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

आडव्या बाटलीसाठी होणार फेरमतदान

By admin | Updated: February 3, 2016 01:40 IST

बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे

टाकळीहाजी : बाटली उभी रहावी म्हणून कितीही आटापिटा केला तरीही महिला शक्तीपुढे अखेर नमावे लागले आहे. महिलांच्या निर्धारामुळे निघोज गावातील दारुबंदीसाठीचे मतदान पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. निघोज (ता. पारनेर) येथील दारूबंदी महिला चळवळीने गावात बाटली आडवी करण्यासाठी लढा उभारला. मात्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतील गोंधळामुळे मात्र या महिलांना तांत्रिक कारणास्तव पराभवाला सामोरे जावे लागले होते. तरीही हार न मानता त्यांनी दारुबंदीच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने महिलांच्या निर्धाराला मोठे पाठबळ लाभले. अण्णा हजारे यांच्यासह पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विजय औटी यांनीही या प्रकरणी लक्ष घातले. आडव्या बाटलीसाठी फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आल्याने दारूधंदावाले व त्यामध्ये गडबड घोटाळा करणारे अधिकारी मात्र हादरले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत यावर आमदार विजय औटी यांनी शिंदे व प्रशासनाचे लक्ष वेधून निघोजचे महिलांचे आंदोलन व संबंधित खात्याची भूमिका, यावर चर्चा घडवून आणली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची सविस्तर चौकशी करून फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. आठ दिवसांपूर्वी दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले; मात्र उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांनी निकाल यंत्रणा फिरविली असल्याचा महिलांचा आक्षेप होता. त्यामुळे अवघ्या ७० मतांनी दारूबंदी फेटाळली गेली. चार हजार महिलांचे मतदान असणाऱ्या गांवामध्ये मतदानासाठी २,५०० महिला आल्या होत्या; मात्र मतदार यादीत नावच नाही, ओळखपत्र नाही, अशी कारणे पुढे करून उत्पादनशुल्क खात्याने अनेक महिलांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ दिला नव्हता. ५०० महिलांना मतदानात भाग न घेता परत जावे लागले. मतदान झालेल्या दोन हजार मतदानातसुद्धा बाद मतांचे प्रमाण सर्वाधिक होते. ‘हा पराभव केवळ या भ्रष्ट यंत्रणेने केला असून, आम्हाला न्याय न दिल्यास कायदाच हातात घेऊ; मग आम्हाला तुरुंगात टाका किंवा फासावर चढवा,’ असा निर्वाणीचा इशारा देत महिला संघटनेने जोरदार आंदोलन केल.