शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राजगडवर ‘रोप वे’ स्वागतार्ह; पण अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

दुर्गप्रेमींचा सवाल : गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने काळजी घेण्याची मागणी (भाग -१) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजगड किल्ल्यावर ...

दुर्गप्रेमींचा सवाल : गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने काळजी घेण्याची मागणी

(भाग -१)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राजगड किल्ल्यावर ‘रोप वे’ची निर्मिती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वातून करण्यात येणार आहे. याचे दुर्गसंवर्धक आणि दुर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. मात्र, रोप वे केल्यानंतर किल्ल्यावर येणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार, असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. गडाचे पावित्र्य धोक्यात येऊ नये, यासाठी शासनानी आधी काळजी घेऊन नियोजन करावे आणि नंतरच ‘रोप वे’ची निर्मिती करावी, अशी मागणी देखील केली आहे.

भारतीय पोर्ट रेल व ‘रोप वे’ महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाने (डीओटी) सामंजस्य करार नुकताच केला. राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार केला आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हा ‘रोप वे’ बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल, असेही सांगितले जात आहे.

सध्या दुर्गसंवर्धक, ट्रेकर्स आणि संशोधक यांचे किल्ल्यावर जाण्याचे प्रमाण जास्त आहे. ‘रोप वे’ होणार असल्याने यामध्ये सर्वसामान्य नागरिक देखील जाऊ शकतो. त्यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता आहे. गडावरील पुरातन वास्तू, वाडे, इमारती आदी ऐतिहासिक स्थळांची मोडतोड होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गडावर किती भूभाग सपाट आहे. त्यानुसार ‘रोप वे’साठी किती जागा लागणार आहे. त्याचबरोबर एकावेळी गडावर किती लोक सामावून घेता येतील, याचा विचार आधी शासनाने करावा. त्यानंतरच पुढील कामांना परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.

-------

कोट

‘रोप वे’ चांगला; पण सुरक्षेची व्यवस्था काय ?

शासनाचा निर्णय चांगला आहे. ‘रोप वे’मुळे एकाच वेळी अनेक लोक गडावर येणार आहेत. ही सर्व लोकं गडावर सामावून कशी घेणार आहे, गर्दी झाल्यावर लोकं सैरभैर कुठेही चढणार, उतरणार. त्यामुळे गडावरील ऐतिहासिक वास्तू पडण्याचा, मोडतोड होण्याचा धोका आहे. त्या लोकांवर नियंत्रण कसे मिळवणार आहे, आधीच अनेक किल्ल्यांवरील वास्तूंची पडझड झाली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती, देखभाल होणे आवश्यक आहे. राजगडावर ज्या वास्तू सुस्थितीत आहेत. त्याची नासधूस होणार नाही, याची शासनाने खबरदारी घ्यावी. त्यानंतरच मग ‘रोप वे’ला परवानगी द्यावी.

- सचिन जोशी, संशोधक, पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज

-------

कोट

मद्यपी, अपप्रवृत्तींना आळा घाला

छत्रपती शिवाजी महाराज यांची किल्ले राजगड ही पहिली राजधानी होती. त्यामुळे राजगडला ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या केवळ दुर्गभटके मावळे आणि संशोधन करण्यासाठी काही ठराविक लोक गडावर येतात. ‘रोप वे’ झाल्यावर शिवरायांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांना देखील गड पाहण्याची संधी मिळणार आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, सहजपणे गडावर येता येते म्हणून अनेक मंडळी गर्दी, घाण करू शकतात. पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. गडावर कचरा करणाऱ्या आणि मद्यपी लोकांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा गडाचे ऐतिहासिक पावित्र्य धोक्यात येऊ शकते.

- संदीप तापकीर, दुर्ग अभ्यासक

--------

पर्यटन वाढीसाठी निर्णय चांगला; पण पावित्र्य जपणे आवश्यक

राजगडावर ‘रोप वे’ची निर्मिती केल्याने पर्यटन वाढून शासनाला आर्थिक उत्पन्न मिळणार असेल तर चांगले आहे. मात्र, त्या उत्पन्नातूनच गडाचे संवर्धन व्हावे. कारण राज्यातील अनेक किल्ल्यांची दुरवस्था, पडझड झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे अनास्थेमुळे सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष होत आहे. ‘रोप वे’ बनवण्यापूर्वी शासनाने कार्यशाळा घेऊन रोडमॅप मांडावा. पर्यटन वाढीबरोबरच गडावर खासगी व्यावसायिक वापर किती होणार आहे. आदी विविध बाबी लोकांना अवगत करणे गरजेचे आहे.

- भगवान चवले, एव्हरेस्टवीर आणि दुर्ग अभ्यासक