शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

बहुतेक एटीएममध्ये खडखडाटच

By admin | Updated: May 8, 2017 03:17 IST

सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक वेळा एटीएममधून पैसे मिळेनासे झाले आहेत. एटीएममधून आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.धनकवडी, दत्तनगर, आंबेगाव पठार, बालाजीनगर या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत केलेल्या पाहणीमध्ये सर्वच बँकांच्या २३ एटीएमपैकी केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. सध्या यात्रा, उरुस, लग्नसराई असल्याने जवळ पैसे आवश्यक असताना एटीएममधून तो  मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.  भारती विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने मुलांनी नाराजी व्यक्त केली. पैसे काढण्यासाठी एटीएमचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.  पैसे काढणाऱ्यांची संख्या  जास्त असल्याने कॅश लवकर संपत आहे. पैशासाठी पायपीटआंबेगाव बुद्रुक : येथील अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खात्यात पैसे असतानाही एटीएममधून ते मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आंबेगाव पठार येथील सहा एटीएमपैकी दोन ते तीन एटीएममध्येच पैसे उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. साई सिद्धी चौकातील एटीएममध्ये दुपारपासून पैसे संपल्याने नागरिकांना एटीएम शोधून पैसे काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.हाल कमी होईनाहडपसर : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले, शासनाने आॅनलाइन व्यवहारासाठी अनेक योजना व बक्षिसे जाहीर केली. नागरिकांचे खिसे खाली झाले. मात्र एटीएम व आॅनलाइन व्यवहार नागरिकांसाठी अजूनही सुकर झाले नाहीत. अनेक एटीएम सुरू; पण कॅश नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ६ महिने उलटूनही ही अवस्था असेल तर ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे. स्वाइप मशिनवरही मोठ्या प्रमाणात कर लावला जात असल्याने त्रासात अधिक भर पडली आहे. नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.ज्येष्ठ नागरिकांचे होताहेत हालसहकारनगर : सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पेन्शनर्स राहतात. त्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय बँकेची संख्याही मोठी आहे. मात्र नोटाबंदी होऊन सहा महिने लोटले तरी पैशाचा अभावच आहे. अनेक एटीएममध्ये पुरेशी कॅश नसल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशा वेळी रांगेत उभे राहून पैसे काढणे प्रत्येकालाच प्रकृतीमानानुसार जमेल असे नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच उन्हाच्या चटक्यामुळे तर अधिकच हाल सुरू झाले आहेत.