शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बहुतेक एटीएममध्ये खडखडाटच

By admin | Updated: May 8, 2017 03:17 IST

सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : सहा महिन्यांपूर्वी एक हजार व पाचशेच्या नोटा रद्द केल्यापासून अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने चलन तुटवडा जाणवत आहे. अनेक वेळा एटीएममधून पैसे मिळेनासे झाले आहेत. एटीएममधून आवश्यकतेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.धनकवडी, दत्तनगर, आंबेगाव पठार, बालाजीनगर या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत केलेल्या पाहणीमध्ये सर्वच बँकांच्या २३ एटीएमपैकी केवळ एकाच बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. सध्या यात्रा, उरुस, लग्नसराई असल्याने जवळ पैसे आवश्यक असताना एटीएममधून तो  मिळत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.  भारती विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने मुलांनी नाराजी व्यक्त केली. पैसे काढण्यासाठी एटीएमचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.  पैसे काढणाऱ्यांची संख्या  जास्त असल्याने कॅश लवकर संपत आहे. पैशासाठी पायपीटआंबेगाव बुद्रुक : येथील अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खात्यात पैसे असतानाही एटीएममधून ते मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आंबेगाव पठार येथील सहा एटीएमपैकी दोन ते तीन एटीएममध्येच पैसे उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. साई सिद्धी चौकातील एटीएममध्ये दुपारपासून पैसे संपल्याने नागरिकांना एटीएम शोधून पैसे काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.हाल कमी होईनाहडपसर : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिने पूर्ण झाले, शासनाने आॅनलाइन व्यवहारासाठी अनेक योजना व बक्षिसे जाहीर केली. नागरिकांचे खिसे खाली झाले. मात्र एटीएम व आॅनलाइन व्यवहार नागरिकांसाठी अजूनही सुकर झाले नाहीत. अनेक एटीएम सुरू; पण कॅश नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ६ महिने उलटूनही ही अवस्था असेल तर ही परिस्थिती नेमकी कधी बदलणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे. स्वाइप मशिनवरही मोठ्या प्रमाणात कर लावला जात असल्याने त्रासात अधिक भर पडली आहे. नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.ज्येष्ठ नागरिकांचे होताहेत हालसहकारनगर : सहकारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पेन्शनर्स राहतात. त्यांची राष्ट्रीयीकृत बँकेत खाती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय बँकेची संख्याही मोठी आहे. मात्र नोटाबंदी होऊन सहा महिने लोटले तरी पैशाचा अभावच आहे. अनेक एटीएममध्ये पुरेशी कॅश नसल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ज्या ठिकाणी पैसे आहेत, तेथे मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशा वेळी रांगेत उभे राहून पैसे काढणे प्रत्येकालाच प्रकृतीमानानुसार जमेल असे नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच उन्हाच्या चटक्यामुळे तर अधिकच हाल सुरू झाले आहेत.