शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:40 IST

शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत.

भोसरी : शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. आवश्यक रक्कम मिळविण्यासाठी अनेक एटीएम पालथी घालावी लागत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.औद्योगिक, निवासी, वाणिज्य अशी सरमिसळ असलेल्या भोसरी परिसरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.कामगार, विद्यार्थी वर्गाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परिसरातील एटीएमची संख्या मागील अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. उलट बँकांकडून तसेच एटीएम कंपन्यांकडून मशिन्सची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक एटीएम नादुरुस्त झाले आहेत. काही एटीएमचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सर्व्हर डाऊन, एर्ररमुळे बºयाचदा रोकड काढण्यात अडचणी येतात. वारंवार भेडसावणाºया या समस्यांमुळे दोन ते तीन दिवस एटीएम बंद राहतात.दुसरीकडी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे सुट्टे चलन म्हणून पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांवरील भार वाढत आहे. एटीएममध्येही याच समस्येचा सामना करावा लागतो. पाचशे व शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्याने सुट्टे चलन उपलब्ध नसल्याचे संदेश एटीएमवर दिसतात. त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढायची म्हटल्यास बँक गाठण्याखेरीज नागरिकांकडे पर्याय राहत नाही. बँक सुटीच्या कालावधीत मोठी गैरसोय होते. रक्कम मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेक एटीएम पालथी घालावी लागतात. गरजूंना तर भोसरी लगतच्या परिसरातील एटीएममध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे एटीएम सुविधेच्या मुख्य हेतूला बाधा पोहोचली असून एनी टाईम मनी (एटीएम) ऐवजी सम टाईम मनी (एसटीएम) असे फलक एटीएम केंद्रांबाहेर लावावेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी एटीएमची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्याबरोबरच सुट्या चलनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.>भोसरी परिसर : दरवाजे तुटल्याने सुरक्षा रामभरोसेशहरात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भोसरी परिसरातील एटीएमची सुरक्षा अद्याप वाºयावरच आहे. काही एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आहे. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. बँकेच्या आवारातील एटीएम वगळता अन्य ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत नाही. काही एटीएममध्ये तसेच दरवाजासमोर अक्षरश: श्वान झोपलेले पहायला मिळतात. बहुसंख्य एटीएम कचºयाचे आगार बनले आहेत. एटीएम केंद्रांची स्वच्छता केली जात नाही. याठिकाणी कचºयाचे डबे ठेवले जात नाहीत. त्यात ग्राहक व्यवहाराच्या छापील पावत्यांचा कचरा एटीएममध्येच टाकून देतात. बँक तसेच एटीएम कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.