शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:40 IST

शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत.

भोसरी : शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. आवश्यक रक्कम मिळविण्यासाठी अनेक एटीएम पालथी घालावी लागत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.औद्योगिक, निवासी, वाणिज्य अशी सरमिसळ असलेल्या भोसरी परिसरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.कामगार, विद्यार्थी वर्गाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परिसरातील एटीएमची संख्या मागील अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. उलट बँकांकडून तसेच एटीएम कंपन्यांकडून मशिन्सची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक एटीएम नादुरुस्त झाले आहेत. काही एटीएमचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सर्व्हर डाऊन, एर्ररमुळे बºयाचदा रोकड काढण्यात अडचणी येतात. वारंवार भेडसावणाºया या समस्यांमुळे दोन ते तीन दिवस एटीएम बंद राहतात.दुसरीकडी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे सुट्टे चलन म्हणून पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांवरील भार वाढत आहे. एटीएममध्येही याच समस्येचा सामना करावा लागतो. पाचशे व शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्याने सुट्टे चलन उपलब्ध नसल्याचे संदेश एटीएमवर दिसतात. त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढायची म्हटल्यास बँक गाठण्याखेरीज नागरिकांकडे पर्याय राहत नाही. बँक सुटीच्या कालावधीत मोठी गैरसोय होते. रक्कम मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेक एटीएम पालथी घालावी लागतात. गरजूंना तर भोसरी लगतच्या परिसरातील एटीएममध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे एटीएम सुविधेच्या मुख्य हेतूला बाधा पोहोचली असून एनी टाईम मनी (एटीएम) ऐवजी सम टाईम मनी (एसटीएम) असे फलक एटीएम केंद्रांबाहेर लावावेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी एटीएमची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्याबरोबरच सुट्या चलनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.>भोसरी परिसर : दरवाजे तुटल्याने सुरक्षा रामभरोसेशहरात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भोसरी परिसरातील एटीएमची सुरक्षा अद्याप वाºयावरच आहे. काही एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आहे. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. बँकेच्या आवारातील एटीएम वगळता अन्य ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत नाही. काही एटीएममध्ये तसेच दरवाजासमोर अक्षरश: श्वान झोपलेले पहायला मिळतात. बहुसंख्य एटीएम कचºयाचे आगार बनले आहेत. एटीएम केंद्रांची स्वच्छता केली जात नाही. याठिकाणी कचºयाचे डबे ठेवले जात नाहीत. त्यात ग्राहक व्यवहाराच्या छापील पावत्यांचा कचरा एटीएममध्येच टाकून देतात. बँक तसेच एटीएम कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.