शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शहरातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:40 IST

शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत.

भोसरी : शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई, तर काही ठिकाणी एर्रर, नादुरुस्त झालेल्या एटीएम मशिन यामुळे भोसरी परिसरातील बहुसंख्य एटीएम निरुपयोगी ठरत आहेत. आवश्यक रक्कम मिळविण्यासाठी अनेक एटीएम पालथी घालावी लागत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.औद्योगिक, निवासी, वाणिज्य अशी सरमिसळ असलेल्या भोसरी परिसरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.कामगार, विद्यार्थी वर्गाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परिसरातील एटीएमची संख्या मागील अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. उलट बँकांकडून तसेच एटीएम कंपन्यांकडून मशिन्सची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेक एटीएम नादुरुस्त झाले आहेत. काही एटीएमचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सर्व्हर डाऊन, एर्ररमुळे बºयाचदा रोकड काढण्यात अडचणी येतात. वारंवार भेडसावणाºया या समस्यांमुळे दोन ते तीन दिवस एटीएम बंद राहतात.दुसरीकडी दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे सुट्टे चलन म्हणून पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांवरील भार वाढत आहे. एटीएममध्येही याच समस्येचा सामना करावा लागतो. पाचशे व शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा नसल्याने सुट्टे चलन उपलब्ध नसल्याचे संदेश एटीएमवर दिसतात. त्यामुळे दोन हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढायची म्हटल्यास बँक गाठण्याखेरीज नागरिकांकडे पर्याय राहत नाही. बँक सुटीच्या कालावधीत मोठी गैरसोय होते. रक्कम मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेक एटीएम पालथी घालावी लागतात. गरजूंना तर भोसरी लगतच्या परिसरातील एटीएममध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे एटीएम सुविधेच्या मुख्य हेतूला बाधा पोहोचली असून एनी टाईम मनी (एटीएम) ऐवजी सम टाईम मनी (एसटीएम) असे फलक एटीएम केंद्रांबाहेर लावावेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी एटीएमची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्याबरोबरच सुट्या चलनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.>भोसरी परिसर : दरवाजे तुटल्याने सुरक्षा रामभरोसेशहरात एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भोसरी परिसरातील एटीएमची सुरक्षा अद्याप वाºयावरच आहे. काही एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आहे. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. बँकेच्या आवारातील एटीएम वगळता अन्य ठिकाणी सुरक्षारक्षक दिसून येत नाही. काही एटीएममध्ये तसेच दरवाजासमोर अक्षरश: श्वान झोपलेले पहायला मिळतात. बहुसंख्य एटीएम कचºयाचे आगार बनले आहेत. एटीएम केंद्रांची स्वच्छता केली जात नाही. याठिकाणी कचºयाचे डबे ठेवले जात नाहीत. त्यात ग्राहक व्यवहाराच्या छापील पावत्यांचा कचरा एटीएममध्येच टाकून देतात. बँक तसेच एटीएम कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.