शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:44 IST

विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे.

बाणेर : विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे. ‘पथदिवे रात्री बंद आणि दिवसा सुरू’ अशी परिस्थिती सध्या बाणेर, बालेवाडी भागात सर्रास सुरू आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने कारभार सुधारून विजेचा अपव्यय टाळण्याची अपेक्षा बाणेर, बालेवाडी भागातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पालिका पथदिव्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. नवीन पथदिवे लावणे. तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, हायमास्ट बसविणे यासाठी हा खर्च होतो. अंधार पडण्यास सुरुवात झाली की, रस्त्यावरील दिवे सुरू होणे व पहाटे वेळेवर बंद होणे अपेक्षित असते. मात्र बाणेर, बालेवाडी भागात काही ठिकाणी दिवसभर हे दिवे सुरूच असतात. त्याउलट अनेक ठिकाणी रात्रीही रस्त्यावरील दिवे बंद असतात. पथदिवे सुरू आहेत का? कुठे बिघाड आहेत का? हे विद्युत विभागातील इंजिनिअर तसेच संबंधित कर्मचाºयांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून पाहणे आवश्यक आहे. मात्र पालिका कर्मचारी बाणेर, बालेवाडी भागात फिरून हे सर्वेक्षण करतात का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.जागरूक नागरिकांनी अनेकदा ही बाब संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही याबाबत अद्याप कार्यवाही होत नाही. त्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याच कर्मचाºयांच्या अनास्थेमुळे पथदिवे भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय परिसरात होत आहे.आमच्या भागात पथदिवे असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. शहरात नव्हे, तर एखाद्या खेड्यात राहत असल्याची प्रचिती आम्हाला येत आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागण्या केल्या; परंतु प्रशासन दखलच घेत नाही, असे अनेक नागरिकांनी सांगितले.