शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:44 IST

विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे.

बाणेर : विजेच्या बचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत असताना महापालिकेच्या बाणेर, बालेवाडी विद्युत विभाग मात्र याबाबत सुस्त आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन सध्या बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांना होत आहे. ‘पथदिवे रात्री बंद आणि दिवसा सुरू’ अशी परिस्थिती सध्या बाणेर, बालेवाडी भागात सर्रास सुरू आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने कारभार सुधारून विजेचा अपव्यय टाळण्याची अपेक्षा बाणेर, बालेवाडी भागातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पालिका पथदिव्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. नवीन पथदिवे लावणे. तसेच पथदिव्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती, हायमास्ट बसविणे यासाठी हा खर्च होतो. अंधार पडण्यास सुरुवात झाली की, रस्त्यावरील दिवे सुरू होणे व पहाटे वेळेवर बंद होणे अपेक्षित असते. मात्र बाणेर, बालेवाडी भागात काही ठिकाणी दिवसभर हे दिवे सुरूच असतात. त्याउलट अनेक ठिकाणी रात्रीही रस्त्यावरील दिवे बंद असतात. पथदिवे सुरू आहेत का? कुठे बिघाड आहेत का? हे विद्युत विभागातील इंजिनिअर तसेच संबंधित कर्मचाºयांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून पाहणे आवश्यक आहे. मात्र पालिका कर्मचारी बाणेर, बालेवाडी भागात फिरून हे सर्वेक्षण करतात का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.जागरूक नागरिकांनी अनेकदा ही बाब संबंधित कर्मचाºयांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही याबाबत अद्याप कार्यवाही होत नाही. त्यामुळे भरदिवसा पथदिवे सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याच कर्मचाºयांच्या अनास्थेमुळे पथदिवे भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय परिसरात होत आहे.आमच्या भागात पथदिवे असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. शहरात नव्हे, तर एखाद्या खेड्यात राहत असल्याची प्रचिती आम्हाला येत आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागण्या केल्या; परंतु प्रशासन दखलच घेत नाही, असे अनेक नागरिकांनी सांगितले.