शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यांची वाढली उंची अन् घरे झाली खुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:10 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत.

- सुषमा नहेरकर-शिंदे पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. परंतु ही रस्त्यांची कामे करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा वापर न करता सिमेंट रस्त्यांची वाढवलेली भरमसाठ उंची व डांबरी रस्त्यांवरील दरवर्षी वाढत जाणारे थरच्या थर यामुळे शहरातील हजारो सोसायट्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.डांबरी रस्ते करतानादेखील कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न करता जुना डांबरी रस्ता खरडून न काढता जुन्या रस्त्यांवर पुन्हा डांबराचे थर दिले जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात बहुतेक भागात रस्त्यांची उंची सोसायट्या, घरांपेक्षा अधिक झाली आहे. महापालिकेच्या नियमांनुसार, रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांचे जोते जमिनीच्या पातळीपासून ४५ सेंटिमीटर उंच असणे गरजेचे आहे. त्यानुसारच नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते; मात्र महापालिकेकडून नागरिकांना हा नियम लागू केला जात असला, तरी महापालिकेकडून मात्र रस्त्यांची कामे करताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. सिमेंट रस्ते करताना जुना डांबरी रस्ता तसाच ठेऊन त्यावर सिमेंटचा भलामोठा थर दिला जातो. तर डांबरी रस्ता करतानादेखील त्याच-त्याच रस्त्यांवर डांबराचे थरच्या थर वाढवले आहेत. यामुळे घर, सोसायट्यांच्या जोत्यापेक्षा रस्त्यांची उंची अधिक वाढल्याने नागरिकांच्या घरातपाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत, प्रभात रस्ता, कोथरूड, सिंहगड रोड, गोखलेनगर, भांडारकर रस्ता, कर्वेनगर, लक्ष्मी रस्ता आदी अनेक भागांमध्ये रस्त्यांची उंची घर, सोसायट्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या सोसायट्या, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे.>तक्रार करूनही दखल नाहीगोखलेनगर येथील आमच्या कपिला सोसायटीमध्ये महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत नियमितपणे रस्त्यांची कामे करण्यात आले. डांबरी रस्त्यांवर थरच्या थर दिल्याने सोसायटीमधील रस्ते चकाचक झाले खरे. परंतु हे रस्ते करताना कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा उपयोग न केल्याने घराची उंची वाढवूनदेखील रस्त्यांची उंची वाढतच राहिल्याने पावसाचे रस्त्यावर येणारे पाणी थेट सोसायटी, घरामध्ये येते. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रार करून देखील अद्याप काही दखल घेतली गेली नाही.-डॉ. अ. द. गोडबोले, नागरिक (गोखलेनगर)>कामे करताना दक्षता घेतली जातेशहरामध्ये कोणत्याही रस्त्यांची कामे करताना काही नियम व अटी ठरल्या आहेत. नव्याने एखाद्या रस्त्याचे काम करताना जुना रस्ता उखडून काढला जातो व त्यानंतर नवीन डांबरी अथवा सिमेंट रस्ता तयार केला जातो. त्यामुळे कोणत्याही रस्त्याचे काम करताना सोसायट्या, त्या परिसरातील घरांमध्ये उंची अधिक होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. परंतु काही ठिकाणी असे झाले असले तर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाईल.- अनिरुद्ध पावसकर,पथ विभागप्रमुख, महापालिका