शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

नदीचे पाणी शेतीला नव्हे; पुन्हा नदीतच

By admin | Updated: October 3, 2015 01:51 IST

शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा

पुणे : शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची नामुष्की उद्भवली आहे. पाटबंधारे विभागाकडून हे पाणी सोडले जाणाऱ्या बेबी कालव्याचे कामच ुअपूर्ण असल्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रकल्प बंद केला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीही सोडलेले पाणी शेतीला नव्हे तर चक्क पुन्हा नदीलाच सोडण्यात आले आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा लागणार आहे. सन २००५-०६पर्यंत शहराचा विस्तार मर्यादित असल्याने पालिकेस खडकवासला प्रकल्पातील केवळ १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यामुळे २०११पर्यंत पालिकेला पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी ११.५० टीएमसी पाणी दिले जात होते. त्यानंतर पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅकवेल उभारला जात आहे. हे पाणी या बंधाऱ्यातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटरच्या वाहिनीद्वारे हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटनही झाले. मात्र, हे पाणी वाहून घेऊन जाणाऱ्या कालव्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने हे पाणी शेतीसाठी पोहोचणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जॅकवेलची तपासणी करण्यासाठी अवघा अर्धातास कालव्यात पाणी सोडून प्रकल्प बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानंतरच पाणी सोडण्यापुरतीच महापालिकेची भूमिका असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.