शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नदीचे पाणी शेतीला नव्हे; पुन्हा नदीतच

By admin | Updated: October 3, 2015 01:51 IST

शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा

पुणे : शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची नामुष्की उद्भवली आहे. पाटबंधारे विभागाकडून हे पाणी सोडले जाणाऱ्या बेबी कालव्याचे कामच ुअपूर्ण असल्याने दुसऱ्याच दिवशी हा प्रकल्प बंद केला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीही सोडलेले पाणी शेतीला नव्हे तर चक्क पुन्हा नदीलाच सोडण्यात आले आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवावा लागणार आहे. सन २००५-०६पर्यंत शहराचा विस्तार मर्यादित असल्याने पालिकेस खडकवासला प्रकल्पातील केवळ १० ते ११ टीएमसी पाण्याची गरज भासत होती. त्यामुळे २०११पर्यंत पालिकेला पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी ११.५० टीएमसी पाणी दिले जात होते. त्यानंतर पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅकवेल उभारला जात आहे. हे पाणी या बंधाऱ्यातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटरच्या वाहिनीद्वारे हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाणार आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटनही झाले. मात्र, हे पाणी वाहून घेऊन जाणाऱ्या कालव्याचे काम अद्यापही अर्धवट असल्याने हे पाणी शेतीसाठी पोहोचणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी जॅकवेलची तपासणी करण्यासाठी अवघा अर्धातास कालव्यात पाणी सोडून प्रकल्प बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तर पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानंतरच पाणी सोडण्यापुरतीच महापालिकेची भूमिका असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.