शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वाळकी नदीवरील पूल धोकादायक

By admin | Updated: May 12, 2017 04:49 IST

कोळवण खोऱ्यातील करमोळी ते चाले दरम्यानच्या वाळकी नदीवरील पुलाचे कठडे ढासळल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : कोळवण खोऱ्यातील करमोळी ते चाले दरम्यानच्या वाळकी नदीवरील पुलाचे कठडे ढासळल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावर झाडे वाढलेली आहेत, त्यामुळे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोळवण भागातील अनेक नागरिक व शेतकरी या पुलाचा दळणवळणासाठी वापर करतात. या रस्त्यावरून पुढे हडशीला सत्यसाईबाबा मंदिर, पवना धरण, तुंग-तिकोणा, लोहगड-विसापूर हे किल्ले, लोणावळा ही पर्यटनस्थळे आहेत. सध्या शाळेला सुट्या असल्याने या रस्त्यावर पुण्यातून अनेक पर्यटक जातात. तसेच मुळशीतील अनेक लोक मुंबई, कामशेत, पवनानगर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. पूल अरुंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. तसेच या पुलावर लहान- मोठ्या अपघातांच्या घटना घडत असून, या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागच्या आठवड्यात वाळकी नदीवरीलच कोळवण ते हडशी दरम्यानच्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुख्य आधार असलेला खांब पडला होता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवठा केला तेव्हा या पुलाचे काम सुरु केले. तसेच मुळा नदीवरील घोटावडे येथील पूलही जीर्ण झाल्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी पडला होता. यावेळी पुलावरून जात असताना दाम्पत्य जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. अशा धोकादायक झालेल्या पुलांवर अपघात घडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे.