शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोरोनाचे वाढते रुग्ण तिसऱ्या लाटेचे संकेत? ग्रामीण भागात नागरिक आता तरी सतर्क होतील का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती ...

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत.अनेक तरुण करोनाचे बळी झाले आहेत.

दुसरी लाट संपतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देखील आरोग्य खात्याने दिला होता. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असताना कोरोनाबाधितांचे कमी प्रमाण हे दिलासा देणारे होते.दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच प्रत्येकजण बिनधास्त आणि निर्धास्त झालेला पाहायला मिळतोय.मध्यंतरीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या कमी झालेल्या प्रमाण पाहून जणू कोरोना आता संपलाच अशाच आविर्भावात आता नागरिक वावरताना दिसत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने, भाजीबाजार व इतर व्यवहार सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याकाळात दुकानांमध्ये,बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक ठिकाणी सॅनिटायझर देखील वापर होताना दिसत नाही.

अनेकांनी आता मास्क वापरायचे देखील बंद केले आहेत.लग्न, वराती, वाढदिवस याशिवाय जे अन्य कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे गर्दी पाहायला मिळत आहे. मंगल कार्यालयांमध्ये लग्नांना होणारी गर्दी देखील चिंताजनक आहे.

काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होता हे देखील नागरिक विसरून गेल्याचे दिसून येते.आता तरी आपण भानावर येऊ का , की पुन्हा परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच आपण पुन्हा भानावर येऊ? हा प्रश्न सध्या तरी सतावणारा आहे.

"मध्यंतरीच्या काळात संपूर्ण जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. आता सध्या पुन्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. मास्क,सॅनिटायझर यांसह नागरिकांनी लग्न,वराती, वाढदिवस यासारखे गर्दी होईल असे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने टाळावेत. लसीकरण झालेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत आहे,म्हणून लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी.

डॉ.उमेश गोडे, तालुका आरोग्य अधिकारी,

जुन्नर

"मला काहीही होत नाही या भावनेमुळे कोरोनाचा अधिक प्रसार होतोय. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होणे हा प्रभावी उपाय आहे.

१८ ते ४५ वयोगटातील सर्वांना लसीकरण वेगाने व्हावे. एकाच वेळी संपूर्ण गावच्या गाव लसीकरण झाले तर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. लग्नांवर शासनाने कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. लग्नाला ५० लोकांची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित असतात.शासनाने लग्नांवर कडक निर्बंध आणले तर कोरोनाचा प्रसार थांबण्यास मोठी मदत होईल."

संतोष ठिकेकर,आदर्श सरपंच,

ठिकेकरवाडी, ता. जुन्नर