शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे वाढते रुग्ण तिसऱ्या लाटेचे संकेत? ग्रामीण भागात नागरिक आता तरी सतर्क होतील का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती ...

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या, शेजारच्या, वस्तीमधील, परिसरातील, अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अवतीभोवती अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत.अनेक तरुण करोनाचे बळी झाले आहेत.

दुसरी लाट संपतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देखील आरोग्य खात्याने दिला होता. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असताना कोरोनाबाधितांचे कमी प्रमाण हे दिलासा देणारे होते.दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच प्रत्येकजण बिनधास्त आणि निर्धास्त झालेला पाहायला मिळतोय.मध्यंतरीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या कमी झालेल्या प्रमाण पाहून जणू कोरोना आता संपलाच अशाच आविर्भावात आता नागरिक वावरताना दिसत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने, भाजीबाजार व इतर व्यवहार सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याकाळात दुकानांमध्ये,बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक ठिकाणी सॅनिटायझर देखील वापर होताना दिसत नाही.

अनेकांनी आता मास्क वापरायचे देखील बंद केले आहेत.लग्न, वराती, वाढदिवस याशिवाय जे अन्य कार्यक्रम आहेत त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे गर्दी पाहायला मिळत आहे. मंगल कार्यालयांमध्ये लग्नांना होणारी गर्दी देखील चिंताजनक आहे.

काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होता हे देखील नागरिक विसरून गेल्याचे दिसून येते.आता तरी आपण भानावर येऊ का , की पुन्हा परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच आपण पुन्हा भानावर येऊ? हा प्रश्न सध्या तरी सतावणारा आहे.

"मध्यंतरीच्या काळात संपूर्ण जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. आता सध्या पुन्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. मास्क,सॅनिटायझर यांसह नागरिकांनी लग्न,वराती, वाढदिवस यासारखे गर्दी होईल असे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने टाळावेत. लसीकरण झालेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण होत आहे,म्हणून लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची लक्षणं दिसून आल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी.

डॉ.उमेश गोडे, तालुका आरोग्य अधिकारी,

जुन्नर

"मला काहीही होत नाही या भावनेमुळे कोरोनाचा अधिक प्रसार होतोय. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण होणे हा प्रभावी उपाय आहे.

१८ ते ४५ वयोगटातील सर्वांना लसीकरण वेगाने व्हावे. एकाच वेळी संपूर्ण गावच्या गाव लसीकरण झाले तर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. लग्नांवर शासनाने कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. लग्नाला ५० लोकांची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित असतात.शासनाने लग्नांवर कडक निर्बंध आणले तर कोरोनाचा प्रसार थांबण्यास मोठी मदत होईल."

संतोष ठिकेकर,आदर्श सरपंच,

ठिकेकरवाडी, ता. जुन्नर