शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मतदानाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST

पुणे : लोकशाही मूल्य नैतिकतेत उतरली नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. मतदानाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आरक्षणाचा ...

पुणे : लोकशाही मूल्य नैतिकतेत उतरली नाहीत तर त्याचा उपयोग होत नाही. मतदानाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आरक्षणाचा हेतू काय याचा विचार केला जात नाही. लोकशाही हे वेगवान वाहन आहे. परंतु, ते चालवायचे कसे हे लोकांना कळत नाही. तरुणांनी सतत जागरूक राहून मतदान केले पाहिजे, असे मत दिग्दर्शक व अभिनेता नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही गप्पा’ हा कार्यक्रम झाला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

लोकशाही मूल्ये, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरुकता निर्माण करण्याचे मार्ग या विषयावर प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार, सुहास पळशीकर, प्रवीण महाजन, रवींद्र धनक, श्रीरंग गोडबोले, राही श्रुती गणेश उपस्थित होते.

सुहास पळशीकर म्हणाले, लोकांनी लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीच्या मर्यादा सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही जगवणारे नागरिक विद्यार्थ्यांनी बनावे.

----

महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंडळे’ सुरू करणार

इव्हीएम मशिनबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत देशपांडे म्हणाले, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मशिनची तपासणी केली जाते. मतदानाच्यावेळी मशिन बंद पडले म्हणून त्यातील डेटा लॉस होत नाही. अशावेळी पुढच्या प्रक्रियेसाठी दुसरे मशिन वापरले जाते. मतदार नोंदणी बंधनकारक करण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, मतदार नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केलेली असणे बंधनकारक केल्यास मतदार नोंदणी वाढू शकते. विद्यार्थ्यांमध्ये मताधिकाराविषयी जाणीव-जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाविद्यालयांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंडळे’ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

----

शहरातला मतदार आत्मकेंद्री

शहरी भागातील नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतला सहभाग कमी का? यावर देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातल्या मतदारांची जीवनशैली अधिक आत्मकेंद्री आहे. करिअर, व्यवसाय यामध्ये तो गुंतलेला आहे. तृतीयपंथी, दिव्यांग तसेच शरीर विक्री करणाऱ्या महिलांना एनजीओमार्फत मतदान प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.