शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

रिक्षाचालकांनी आखल्यात हद्दीच्या रेषा

By admin | Updated: December 1, 2015 03:35 IST

एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या

पिंपरी : एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या रिक्षाचालकाला परिसरात थांबूही देत नाहीत. रिक्षावाले त्यांच्याच व्यवसायातील रिक्षाचालकांना सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील या हद्दीच्या वादामुळे आर्थिक भुर्दंडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.पुणे शहरात रिक्षा चालविणारा एखादा रिक्षाचालक पिंपरी-चिंचवडमध्ये आला, तर त्याला परतीच्या प्रवासात विनाभाडे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याच ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशाला त्या रिक्षात बसू दिले जात नाही. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला रिकामी रिक्षा नेणे भाग पडते. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर बेतते. पुण्याहून येताना-जाताना परतीचे भाडे मिळणार नाही, हे गृहीत धरून प्रवाशांना भरमसाट भाडे आकारले जाते. रिक्षावाल्यांच्या हद्दीच्या धोरणामुळे प्रवाशांना जादा भाडे देण्याचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यात जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांची नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत भागातही अशीच स्थिती आहे. वल्लभनगरच्या रिक्षातळाजवळ थेरगावचा रिक्षावाला गेला, तर त्याला थेरगावचे प्रवासी भाडे घेता येत नाही. भोसरीतील रिक्षावाल्याला पिंपरीतून पिटाळून लावले जाते. रिक्षातळावर काही जण मालकी हक्क असल्याच्या आविर्भाव दाखवितात. रिक्षा संघटना, रिक्षातळांवर थांबणारे रिक्षाचालक यांनी एकत्रित येऊन समन्वयाची भूमिका घेतल्यास समव्यावसायिक असलेल्या काही रिक्षाचालकांवर अन्याय होणार नाही. हद्दीच्या सीमारेषांची झळ त्यांना सोसावी लागणार नाही. विविध ठिकाणच्या प्रस्थापित रिक्षातळांच्या बाजूबाजूने व्यवसाय करणाऱ्यांनाही सामावून घेतल्यास त्यांच्यातील दरी कमी होईल. (प्रतिनिधी)- नव्याने रिक्षा व्यवसायात येणाऱ्यांना तर रिक्षातळ मिळविणे जिकिरीचे होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा संघटना, वेगवेगळे नेते असल्याने त्यांना सामावून घेण्याच्या अडचणी येतात. रिक्षा संघटनांच्या नेत्यांशी ओळख नाही, त्यांना तर संघटनेचे सदस्य होण्यात अडचणी येतात. शहरातील अनेक रिक्षाचालक कोणत्याही रिक्षातळावर न थांबता रात्रीच्या वेळी सर्वत्र फिरून व्यवसाय करतात. त्यांना तर कोणीच वाली नाही. पोटासाठी धडपड म्हणून ते रात्री जागून व्यवसाय करतात. दिवसा त्यांना थांबण्यासाठी रिक्षातळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी फिरून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.