शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

रिक्षाचालकांनी आखल्यात हद्दीच्या रेषा

By admin | Updated: December 1, 2015 03:35 IST

एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या

पिंपरी : एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या रिक्षाचालकाला परिसरात थांबूही देत नाहीत. रिक्षावाले त्यांच्याच व्यवसायातील रिक्षाचालकांना सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील या हद्दीच्या वादामुळे आर्थिक भुर्दंडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.पुणे शहरात रिक्षा चालविणारा एखादा रिक्षाचालक पिंपरी-चिंचवडमध्ये आला, तर त्याला परतीच्या प्रवासात विनाभाडे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याच ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशाला त्या रिक्षात बसू दिले जात नाही. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला रिकामी रिक्षा नेणे भाग पडते. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर बेतते. पुण्याहून येताना-जाताना परतीचे भाडे मिळणार नाही, हे गृहीत धरून प्रवाशांना भरमसाट भाडे आकारले जाते. रिक्षावाल्यांच्या हद्दीच्या धोरणामुळे प्रवाशांना जादा भाडे देण्याचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यात जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांची नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत भागातही अशीच स्थिती आहे. वल्लभनगरच्या रिक्षातळाजवळ थेरगावचा रिक्षावाला गेला, तर त्याला थेरगावचे प्रवासी भाडे घेता येत नाही. भोसरीतील रिक्षावाल्याला पिंपरीतून पिटाळून लावले जाते. रिक्षातळावर काही जण मालकी हक्क असल्याच्या आविर्भाव दाखवितात. रिक्षा संघटना, रिक्षातळांवर थांबणारे रिक्षाचालक यांनी एकत्रित येऊन समन्वयाची भूमिका घेतल्यास समव्यावसायिक असलेल्या काही रिक्षाचालकांवर अन्याय होणार नाही. हद्दीच्या सीमारेषांची झळ त्यांना सोसावी लागणार नाही. विविध ठिकाणच्या प्रस्थापित रिक्षातळांच्या बाजूबाजूने व्यवसाय करणाऱ्यांनाही सामावून घेतल्यास त्यांच्यातील दरी कमी होईल. (प्रतिनिधी)- नव्याने रिक्षा व्यवसायात येणाऱ्यांना तर रिक्षातळ मिळविणे जिकिरीचे होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा संघटना, वेगवेगळे नेते असल्याने त्यांना सामावून घेण्याच्या अडचणी येतात. रिक्षा संघटनांच्या नेत्यांशी ओळख नाही, त्यांना तर संघटनेचे सदस्य होण्यात अडचणी येतात. शहरातील अनेक रिक्षाचालक कोणत्याही रिक्षातळावर न थांबता रात्रीच्या वेळी सर्वत्र फिरून व्यवसाय करतात. त्यांना तर कोणीच वाली नाही. पोटासाठी धडपड म्हणून ते रात्री जागून व्यवसाय करतात. दिवसा त्यांना थांबण्यासाठी रिक्षातळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी फिरून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.