शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

रिक्षाचालकांनी आखल्यात हद्दीच्या रेषा

By admin | Updated: December 1, 2015 03:35 IST

एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या

पिंपरी : एका रिक्षातळावरील रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन दुसऱ्या विभागात गेला, तर त्याला त्या भागातील रिक्षाचालक परतीचे भाडे मिळू देत नाहीत. एवढेच नव्हे, तर बाहेरून आलेल्या रिक्षाचालकाला परिसरात थांबूही देत नाहीत. रिक्षावाले त्यांच्याच व्यवसायातील रिक्षाचालकांना सहकार्य करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यातील या हद्दीच्या वादामुळे आर्थिक भुर्दंडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे.पुणे शहरात रिक्षा चालविणारा एखादा रिक्षाचालक पिंपरी-चिंचवडमध्ये आला, तर त्याला परतीच्या प्रवासात विनाभाडे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याच ठिकाणी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशाला त्या रिक्षात बसू दिले जात नाही. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला रिकामी रिक्षा नेणे भाग पडते. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात भाडे घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकावर बेतते. पुण्याहून येताना-जाताना परतीचे भाडे मिळणार नाही, हे गृहीत धरून प्रवाशांना भरमसाट भाडे आकारले जाते. रिक्षावाल्यांच्या हद्दीच्या धोरणामुळे प्रवाशांना जादा भाडे देण्याचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. ही परिस्थिती केवळ पुण्यात जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांची नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अंतर्गत भागातही अशीच स्थिती आहे. वल्लभनगरच्या रिक्षातळाजवळ थेरगावचा रिक्षावाला गेला, तर त्याला थेरगावचे प्रवासी भाडे घेता येत नाही. भोसरीतील रिक्षावाल्याला पिंपरीतून पिटाळून लावले जाते. रिक्षातळावर काही जण मालकी हक्क असल्याच्या आविर्भाव दाखवितात. रिक्षा संघटना, रिक्षातळांवर थांबणारे रिक्षाचालक यांनी एकत्रित येऊन समन्वयाची भूमिका घेतल्यास समव्यावसायिक असलेल्या काही रिक्षाचालकांवर अन्याय होणार नाही. हद्दीच्या सीमारेषांची झळ त्यांना सोसावी लागणार नाही. विविध ठिकाणच्या प्रस्थापित रिक्षातळांच्या बाजूबाजूने व्यवसाय करणाऱ्यांनाही सामावून घेतल्यास त्यांच्यातील दरी कमी होईल. (प्रतिनिधी)- नव्याने रिक्षा व्यवसायात येणाऱ्यांना तर रिक्षातळ मिळविणे जिकिरीचे होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा संघटना, वेगवेगळे नेते असल्याने त्यांना सामावून घेण्याच्या अडचणी येतात. रिक्षा संघटनांच्या नेत्यांशी ओळख नाही, त्यांना तर संघटनेचे सदस्य होण्यात अडचणी येतात. शहरातील अनेक रिक्षाचालक कोणत्याही रिक्षातळावर न थांबता रात्रीच्या वेळी सर्वत्र फिरून व्यवसाय करतात. त्यांना तर कोणीच वाली नाही. पोटासाठी धडपड म्हणून ते रात्री जागून व्यवसाय करतात. दिवसा त्यांना थांबण्यासाठी रिक्षातळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनी फिरून व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.